अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

मराठवाडा : आत्मनिर्भर भारताची रक्षण भूमी-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संवाद व महाराणा प्रताप पुतळ्याचे अनावरण 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   मराठवाडा — 'आत्मनिर्भर भारत' या महत्त्वाकांक्षी संकल्पनेच्या दिशेने भक्कम पावले टाकत, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज १८ एप्रिल रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण औद्योगिक संवाद सत्र पार पडले. या चर्चासत्रात संरक्षण क्षेत्रातील स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक चर्चा झाली.

    कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, जे राजनाथ सिंह यांच्या हस्ते पार पडले. हा सोहळा केवळ ऐतिहासिक स्मरणरंजन नव्हता, तर त्यातून मातृभूमीप्रेम, राष्ट्रभक्ती आणि आत्मनिर्भरतेचा संदेशही देण्यात आला.

डिफेन्स क्लस्टरसाठी छत्रपती संभाजीनगरची तयारी

    संरक्षण सामग्री उत्पादनात भारत आता आयातदार नसून निर्यातदार देशांच्या यादीत उभा राहिला आहे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले. ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील उद्योजकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये डिफेन्स क्लस्टर उभारणीसाठी आग्रह केला. “येथील उद्योजक धाडसी आणि कल्पक आहेत. त्यांच्यातील क्षमतेला चालना देण्यासाठी डिफेन्स क्लस्टर ही उत्तम संधी ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    राजनाथ सिंह यांनी उद्योजक शिष्टमंडळाला पुढील चर्चा दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे आमंत्रण देत संरक्षण क्षेत्रातील संभाव्य गुंतवणुकीसाठी मार्ग मोकळा केला.

औद्योगिक विस्तारासाठी मोठे पावले

    फडणवीस यांनी जाहीर केले की, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) प्रकल्पासाठी १० हजार एकर जमीन वितरित करण्यात आली असून आणखी ८ हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. “मराठवाडा आता औद्योगिक नकाशावर ठळकपणे दिसतोय. येथील तरुण आणि कुशल मनुष्यबळ देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकते,” असे ते म्हणाले.


महाराणा प्रतापांच्या शौर्याला मानवंदना

   संवाद सत्रानंतर महाराणा प्रताप यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, “महाराणा प्रताप हे अपराजित स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांचे जीवन प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”

राष्ट्रभक्ती, स्वावलंबन आणि औद्योगिक प्रगतीचा संगम

     या ऐतिहासिक प्रसंगी अनेक मान्यवर, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसर 'भारत माता की जय' आणि 'महाराणा प्रताप अमर रहे'च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

    या संवाद सत्रातून फक्त औद्योगिक योजना नाही तर एक नवा आशावाद, आत्मविश्वास आणि देशभक्तीचा ध्यास निर्माण झाला. छत्रपती संभाजीनगरच्या भूमीतून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने निर्णायक सुरुवात झाल्याचा संदेश या कार्यक्रमातून मिळाला.

   मराठवाडा आता केवळ इतिहासाची भूमी नसून, उद्याच्या आधुनिक भारताच्या औद्योगिक आणि सामरिक भविष्यासाठीही रक्षणभूमी ठरणार आहे, यावर सर्वांनी ठाम विश्वास व्यक्त केला.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या