अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी तालुक्यात २२ एप्रिल रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत

 सन २०२५ ते २०३० कालावधीसाठी आरक्षणाची प्रक्रिया सुरू


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम ३ (अ), (ब) व (४) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्हाधिकारी यांनी घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण निश्चित केले आहे.

   या आरक्षण प्रक्रियेनुसार सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. यामुळे सामाजिक समावेशकतेस चालना मिळणार असून सर्व घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाचा न्याय मिळणार आहे.

     या अनुषंगाने २२ एप्रिल २०२५ रोजी मंगळवारच्या दिवशी सकाळी ११ वाजता घनसावंगी तहसील कार्यालयात सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार, घनसावंगी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

     या प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, राजकीय नेते, इच्छुक उमेदवार व नागरिक उपस्थित राहण्याचे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे. ही आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने होणार असून, संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिकरीत्या आयोजित केली जाणार आहे.

आरक्षण सोडतीचे महत्त्व 

    ही सोडत प्रक्रिया आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, यातून निश्चित होणारे आरक्षण हे पुढील पाच वर्षांसाठी लागू राहील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी या सोडतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

संबंधितांकडून उत्सुकता 

    तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी मोठ्या प्रमाणावर उत्सुकता असून, आरक्षणाच्या अनुषंगाने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित ठरणार आहे. यामुळे २२ एप्रिलची ही सोडत तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या