अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

कालव्यात पडून दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; १२ किमी अंतरावर सापडला मृतदेह

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जायकवाडी च्या कालव्यात पडल्याने दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची अतिशय दुर्दैवी घटना २६ मार्च बुधवार रोजी घडली. शोध घेतल्यानंतर बारा किमीवर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला.

    बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे २६ मार्च, बुधवार रोजी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. दहा वर्षीय अमर शिवाजी लोखंडे या मुलाचा कालव्यात पडून वाहून गेल्याने मृत्यू झाला. कुटुंबीय आणि पोलीस प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला, मात्र काल मृतदेह सापडला नाही. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केल्यानंतर दुपारी जातेगाव शिवारात, तब्बल १२ किलोमीटर अंतरावर, मुलाचा मृतदेह आढळून आला.

   अमर लोखंडे, गणेशनगर भागातील रहिवासी, हा काल दुपारी काही मित्रांसह कालव्यावर पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात पडल्याने तो वाहून गेला आणि त्यानंतर पाण्याच्या प्रवाहात बुडाला. सोबत गेलेल्या मुलांनी तातडीने घरी जाऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. कुटुंबीयांनी लगेच कालव्याकडे धाव घेतली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही.

   शोधकार्य सुरू असताना तलवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके, विठ्ठल गायकवाड, सचिन कोरडे, विठ्ठल चव्हाण आदींनी दिवसभर शोध मोहीम राबवली तसेच मच्छीमार मुलांच्या मदतीने आणि कालव्यात जाळे टाकून शोध घेण्यात आला. अखेर आज सकाळी अमरचा मृतदेह जातेगाव शिवारात सापडला.

   हा घटनाक्रम तलवाडा गावातील नागरिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे.लोखंडे या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अमरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या