घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

१ मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार: नवीन शुल्कवाढ लागू

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


    नवी दिल्ली: १ मेपासून देशभरातील एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे, कारण रिझर्व्ह बँकेने एटीएम इंटरचेंज शुल्क वाढवण्यास मान्यता दिली आहे. पूर्वी एका व्यवहारासाठी १७ रुपये शुल्क आकारले जात होते, परंतु आता प्रतिव्यवहार १९ रुपये लागणार आहेत. या वाढीचा परिणाम विशेषतः ज्या ग्राहकांचा एटीएम व्यवहारांचा जास्त वापर होतो त्यांच्यावर अधिक जाणवणार आहे. याशिवाय, खात्यातील शिल्लक तपासण्यासाठीही आता ७ रुपये प्रतिव्यवहार लागणार आहेत, जे आधी ६ रुपये होते.


     रिझर्व बँकेने ही शुल्कवाढ व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या विनंतीनंतर केली आहे. ऑपरेटर्सनी वाढत्या कामकाज खर्चामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगितले होते. यामुळे बँकांना इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी देण्यात आली. हे शुल्क बँक ग्राहकांना त्यांचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणार आहे, ज्याचा भार लहान बँकांच्या ग्राहकांवर विशेषतः अधिक जाणवेल, कारण या बँका मोठ्या वित्तीय संस्थांवर अवलंबून असतात.


शुल्कवाढीचा परिणाम

    १ मेपासून, ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रतिव्यवहार १९ रुपये द्यावे लागतील, जे पूर्वी १७ रुपये होते. याशिवाय, बॅलन्स चौकशीसाठी ७ रुपये प्रतिव्यवहार द्यावे लागतील. ही शुल्कवाढ देशभरातील ग्राहकांवर परिणाम करणार आहे, कारण डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरामुळे एटीएमचा वापर आधीच कमी झाला आहे. कॅशलेस व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात होणारा बदल देखील याचे कारण आहे.

    तथापि, रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही शुल्कवाढ अधिक त्रासदायक ठरू शकते, आणि त्यांना जास्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. एटीएम ही एकेकाळी क्रांतिकारी बँकिंग सेवा होती, परंतु डिजिटल पेमेंटच्या प्रगतीमुळे आता त्याचा वापर कमी होत आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या