घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या- सर्वोच्च न्यायालयाची पाऊलवाट: नॅशनल टास्क फोर्सची स्थापना

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


     सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांमधील आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत नॅशनल टास्क फोर्स (NTF) ची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि शिक्षण संस्थांमधील अपुरे संरक्षण यावर प्रकाश टाकत, कोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढल्याचे लक्षात घेतले आहे.

    माजी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या नेतृत्वाखालील या टास्क फोर्सला विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल. या टास्क फोर्समध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाव्यतिरिक्त राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे प्रतिनिधी, तसेच कायदेशीर बाबींचे सदस्य पदसिद्ध असतील.

   टास्क फोर्स विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमुख कारण शोधण्यासाठी आणि विद्यमान कायदे व धोरणांचे पुनरावलोकन करून त्या सुधारण्यासाठी शिफारसी देणार आहे. त्याचबरोबर, उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही वेळी अचानक तपासणी करण्याचा अधिकार टास्क फोर्सला असेल.

    सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सला आठ महिन्यांच्या आत आपल्या अहवालासह शिफारसी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम, दबावपूर्ण शैक्षणिक वातावरण, आणि त्यांच्या मानसिक ताणाचे निवारण कसे करता येईल यावर विशेष लक्ष दिले जाईल.

    ही पाऊलवाट विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक महत्त्वाची दिशा ठरेल आणि शैक्षणिक संस्थांमधील मुलांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या