घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या २०२४ हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी २०,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच यावर्षी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती.
या घोषणेला प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र शासनाने नुकताच अधिकृत शासननिर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून, या प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे.
धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र शासनाने परिपत्रक काढेल निधी कधी उपलब्ध होणार व शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे.
या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लागेल व राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment