घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०,००० रुपये प्रतिहेक्टरी प्रोत्साहन अनुदान जीआर निघाला



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या २०२४ हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी २०,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच यावर्षी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती.

    या घोषणेला प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र शासनाने नुकताच अधिकृत शासननिर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून, या प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. 

    धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र शासनाने परिपत्रक काढेल निधी कधी उपलब्ध होणार व शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे.

   या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लागेल व राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या