घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २०,००० रुपये प्रतिहेक्टरी प्रोत्साहन अनुदान जीआर निघाला



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     खरीप पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी विधानमंडळाच्या २०२४ हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रतिहेक्टरी २०,००० प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. तसेच यावर्षी नुकत्याच चालू असलेल्या अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती.

    या घोषणेला प्रत्यक्षात आणत महाराष्ट्र शासनाने नुकताच अधिकृत शासननिर्णय जाहीर केला आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

   शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून, या प्रोत्साहनपर अनुदानामुळे त्यांना आर्थिक स्थैर्य लाभणार आहे. 

    धान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे मात्र शासनाने परिपत्रक काढेल निधी कधी उपलब्ध होणार व शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार याबाबत प्रश्नचिन्ह उमटत आहे.

   या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक हातभार लागेल व राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या