अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी: तीन उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडीत, १६ गावातील ग्रामस्थांना पाण्याचा तुटवडा

बाणेगाब, पिंपरखेड, अंतरवाली टेंभी उपकेंद्र बंद 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळ पासून घनसावंगी येथील १३२ केव्ही सबस्टेशनवरून बणेगाव/पिंपरखेड ३३/११ केव्ही विजेच्या लाईनचा पुरवठा अचानक बंद झाला आहे. या फॉल्टमुळे ३३ केव्ही केबल किट जळून भस्म झाली अशी माहिती मिळाली, त्यामुळे विजेचा पुरवठा २२ पर्यंत ही सुरू होऊ शकला नाही. 

  यामुळे ३३ केव्ही अंतरवली टेंभी उपकेंद्राचाही पुरवठा बंद आहे. या उपकेंद्रावर पूर्वी तिर्थपूरी लाईनशी जोडलेली होती, परंतु मागील ४- ५ महिन्यांपासून त्या लाईनचा ब्रेकर खराब झाल्यामुळे तो दुरुस्त न करता, अंतरवली टेंभीची लाईन बानेगावच्या लाईनवर जोडण्यात आली होती.

  या घडलेल्या फॉल्टमुळे बाणेगाव, पिंपरखेड आणि अंतरवली टेंभी या तीन उपकेंद्रांवर आधारलेली बानेगाव, सौदलगाव, विठ्ठल नगर, लिंगसेवडी मंगरूळ, मुद्रेगाव, कोठी, अंतरवाली टेंभी, पाडुळी, खड्का, खडकावाडी, पिंपरखेड, डोंगरवडी, अरगडे गव्हाण आदी गावासह १५ ते १६ गावं अंधारात आहेत.

    विजेअभावी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील थांबला आहे, विजेअभावी पिण्याचे पाणी पुरवठा करणारी यंत्रणा बंद पडल्यामुळे गावांमध्ये पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः ऊसतोडणी कामगार आणि ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे हाल सुरू आहेत. सध्या सुरू असलेली गरमीची लाट परिस्थितीला आणखी बिकट बनवत आहे. कालपासून ग्रामस्थांना प्यायला पाणी उपलब्ध नसल्याने फिल्टरवर मोठी गर्दी होत आहे.

  गावकऱ्यांनी या परिस्थितीत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून प्रशासनाकडून याबाबत त्वरित विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी होत आहे 

  या फॉल्टमुळे जवळपास १५- १६ गावांमध्ये विजेअभावी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह ऊसतोडणी मजूर या परिस्थितीत अडचणीत सापडले आहेत. २१ फेब्रुवारी सकाळी खंडित झालेला विजपुरवठा आज दि २२ रोजी ५:१५ वाजेला म्हणजेच ३१ तासानंतर सुरळीत करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या