अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पोलीस शिपायाकडून अत्याचार

 जालना जिल्ह्यात गुन्हा दाखल;पीक मोबाईल पथकाकडे तपास सोपवला



       छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जालना जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जालना पोलीस दलात कार्यरत असलेल्या संशयित शिपाई संदीप वसंत सोनवणे (वय २८) याने या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले आणि तिच्यावर दोन महिने शारीरिक अत्याचार केले. असे तक्रारीत नमूद केले आहे. ही घटना पोलीस प्रशासनात धक्का देणारी असल्यामुळे कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.

     शिपाई सोनवणे याने छत्रपती संभाजीनगर येथे नर्सिंग अभ्यासक्रम शिकणाऱ्या या २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे वचन दिले आणि त्यानुसार ९ ऑक्टोबर २०२४ ते २ डिसेंबर २०२४ या कालावधीत पोलीस क्वार्टर्समध्ये सतत संबंध ठेवले. मात्र, नंतर सोनवणेने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न ठरवल्याची माहिती त्या तरुणीला मिळताच तिने थेट जालना तालुका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

    सदर तक्रारीनुसार, जालना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे सोपविण्यात आला आहे. पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वातावरण तापलेले असतानाच या घटनेमुळे पोलीस खात्याची अब्रू धोक्यात आल्यामुळे प्रशासनाने घटनेची गुप्तता पाळल्याचे समजते.

      पोलीस प्रशासनावरील या गंभीर आरोपांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या