घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

त्या एसटी बस अपघातात एका बालकाचा मृत्यू; मयताची संख्या तीन

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  काल २१ फेब्रुवारी रोजी सकाळी जालना जिल्ह्यातील अंबड येथील बस स्थानकावर मोठा अपघात घडला होता. एसटी बस क्रमांक एमएच २० बीएल १६०६ चा ब्रेक फेल झाल्यामुळे बस थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती.

  या दुर्घटनेत काल दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला तर आज मध्यरात्रीच्या सुमारास एका दोन वर्षीय बालकांची उपचार सुरू असताना मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघाताचा तपशील

  अंबड बस स्टँडवर अपघाताची घटना घडली तेव्हा बसमध्ये अनेक प्रवासी होते. बस क्रमांक एमएच 20 बीएल 1606 चा ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ती थेट प्लॅटफॉर्मवर चढली.


मृत्यू आणि जखमींची माहिती

  या अपघातात उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत व्यक्तींची नावे मुरलीधर काळे (वय ६०) रा शेवगा ता अंबड आणि खलीलउल्ला अजीमुल्लाह शेख (वय ७०) तर रीहान आलीम शेख (वय २ ) रा धाकलगाव ता अंबड अशी आहेत. रीहान शेख या जखमीला नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. 


  त्याचा २३ फेब्रुवारी रोजी दीड वाजता मृत्यू झाला. अशी माहिती फेरोज पठाण यांनी दिली.तसेच त्याची आई हीना आलीम शेख यांचे हाथ फैक्चर झालेला आसुन जालना येथील रुग्णालय मध्ये उपचार चालु आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या