घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येते - हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे

 तीर्थपुरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात शिवमहापुराण कथा



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येईल असे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी कथेप्रसंगी सांगितले. त्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात संगीतमय शिवमहापुराण कथेवेळी काल बुधवारी बोलत होत्या.


   पुढे हभप साध्वी रुक्मीणीताई हांवरे यांनी आपल्या कथेत त्यांनी समुद्र स्नानाचे महत्त्व पटवून दिले आणि सांगितले की, "समुद्र स्नान केल्याने सर्व जगातील पापे धुतली जातात." या प्रसंगी साध्वींनी संत तुकाराम महाराजांच्या ओवीचा संदर्भ देत म्हटले, "तुका म्हणे गंगासागर, अवघे एक उर्मिसागर."

    कथेच्या माध्यमातून साध्वी रुक्मीणीताईंनी कर्माच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, "मानव देह मिळणे हे मोठे भाग्य आहे. ज्या मनुष्याला मानव देह मिळाला आहे, त्याने चांगले कर्म केले तर त्याला चांगली फळे मिळतात. मात्र वाईट कर्म केल्यास वाईट फळे मिळतात. मानव देह प्राप्त झाला आहे, त्यामुळे चांगले कर्म करा आणि शिवलोकाची प्राप्ती मिळवा. वाईट कर्म केल्यास नरक यातना भोगाव्या लागतात."


     शिवमहापुराण कथेचे श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होतो, असे सांगताना त्यांनी म्हटले, "जो शिवमहापुराण कथा श्रवण करतो, त्याच्या सर्व जन्मजन्मांतील व्यथांचे निवारण होते." या प्रवचनात साध्वींनी भक्तीच्या मार्गावर श्रद्धा आणि स्वच्छतेचे महत्त्वही अधोरेखित केले. "देवाजवळ अस्वच्छता नसायला हवी, स्वच्छता राखली पाहिजे. भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा हवी, तरच भगवंताची भक्ती साधता येईल," असे त्यांनी सांगितले.


    कथेच्या माध्यमातून आलेल्या श्रोत्यांना आध्यात्मिक उन्नतीचा संदेश मिळाला, आणि या संगीतमय कथेने भक्तांना भक्‍तीमय वातावरणाचा अनुभव दिला.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या