अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

शालेय व्यवस्थापन समितीचा अभिनव उपक्रम:शेतकऱ्यांसाठी किसान कार्ड मोफत





वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 घनसावंगी तालुक्यातील मासेगाव ग्रामपंचायत रोजगार सहाय्यक कृष्णा जनार्धन आनंदे व शालेय व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने मासेगाव येथील शेतकऱ्यांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांना त्यांचे किसान कार्ड काढून देण्याची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

   या सेवेसाठी कोणतीही शासकीय किंवा खासगी फी आकारली जाणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या कामासाठी आर्थिक ओझं उचलावं लागणार नाही. मात्र, शेतकरी बंधूंना शालेय व्यवस्थापन समितीने एक खास विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या स्वेच्छेने जि.प. प्राथमिक शाळा मासेगावच्या शाळा विकास निधी पेटीत दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे दान पूर्णतः ऐच्छिक आहे, परंतु या योगदानाच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सहाय्य मिळेल.

  या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किसान कार्डाच्या रूपाने आर्थिक लाभ घेता येणार आहे, तर शाळेला मिळालेल्या दानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नव्या सुविधा निर्माण करता येतील.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या