अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात पहिल्याच दिवशी दहावीच्या पेपर फुटीची घटना

प्रश्नपत्रिका बाहेर, उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स विद्यार्थ्यांना पुरवले



  जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेत पेपर फुटीची धक्कादायक घटना घडली आहे. राज्यभरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली. या परीक्षेला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले आहेत, आणि पहिलाच पेपर म्हणजे मराठी विषयाचा होता. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच बदनापूर येथे प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समोर आले आहे.


घटनाक्रम:


  आज सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर काहीच वेळात मराठी विषयाची प्रश्नपत्रिका बदनापूर येथील एका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, परीक्षा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे समजते. हे पेपर शहरातील झेरॉक्स सेंटरवर पोहोचवून, तेथून थेट उत्तरपत्रिकांचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना पुरवले जात होते. असे समजते ही माहिती कळताच परीक्षेच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


खळबळजनक प्रकार:


  परीक्षेच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेच्या दाव्यानंतर देखील अशा घटना समोर येणे खूपच गंभीर मानले जात आहे. राज्यभरातील परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना आहे. बदनापूरमधील झेरॉक्स सेंटरवर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुरवली जात असल्याने परीक्षेचे भविष्य धोक्यात आले आहे.

  या घटनेमुळे जालना जिल्ह्यातील परीक्षेच्या व्यवस्थापनावर संशय व्यक्त होऊ लागला आहे. या पेपर फुटीच्या घटनेमुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. 


दहावीचा मराठीचा पेपर फुटला नाही - जिल्हाधिकारी 

  आज काही वृत्त वाहिन्यानी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चूकीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे. परंतू प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नसुन, स्थानिक झेरॉक्स दूकानदारांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आलेली नाही. तथापी याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषीं व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या