अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गोंदी पोलीस ठाण्यात विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांची भेट

 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  आज दिनांक २४ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी गोंदी पोलीस स्टेशनला वार्षिक तपासणीच्या कामी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गोंदी पोलिसांच्या मानवंदनेचा स्वीकार करून वर्षभरातील पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेतला. गोंदी पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांनी पोलिसांचे कौतुक केले.

यावेळी, मिश्र यांनी सर्व पोलीस अंमलदारांशी सैनिक संमेलनाच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संपूर्ण पोलीस स्टेशन परिसर, इमारत, व सर्व उपलब्ध रेकॉर्डची तपासणी देखील केली.

    वार्षिक तपासणीदरम्यान जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे, तसेच गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर आणि गोंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

     तपासणी दरम्यान, विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्र यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटलांशी संवाद साधला. तसेच, प्रथम फेस फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्यात आलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या