घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड

नाशिक न्यायालयाचा मोठा निकाल



  नाशिक जिल्हा न्यायालयाने अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कागदपत्र फेरफारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला असून, विरोधकांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. समर्थकांमध्ये नाराजी तर विरोधकांमध्ये आनंदाची लाट आहे.



नेमकं काय आहे प्रकरण?


  सदर प्रकरण १९९५ सालचे आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. आरोपांमध्ये भादंवि कलम ४२०, ४६५, ४७१ व ४७४ आदी कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.


२९ वर्षांनंतर निकाल: शिक्षा आणि दंड


  या प्रकरणाचा निकाल तब्बल २९ वर्षांनंतर लागला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवत २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


राजकीय वातावरण तापले, सरकारची भूमिका काय?


  न्यायालयाच्या या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार गटातील एका मंत्र्यावर ही कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गोंधळात सापडली आहे. या घटनेवर भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  मात्र, आता याप्रकरणी त्यांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती हाती येत असून सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे असे समजते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या