घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड

नाशिक न्यायालयाचा मोठा निकाल



  नाशिक जिल्हा न्यायालयाने अजित पवार गटातील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कागदपत्र फेरफारप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला असून, विरोधकांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. समर्थकांमध्ये नाराजी तर विरोधकांमध्ये आनंदाची लाट आहे.



नेमकं काय आहे प्रकरण?


  सदर प्रकरण १९९५ सालचे आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले होते. तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. आरोपांमध्ये भादंवि कलम ४२०, ४६५, ४७१ व ४७४ आदी कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.


२९ वर्षांनंतर निकाल: शिक्षा आणि दंड


  या प्रकरणाचा निकाल तब्बल २९ वर्षांनंतर लागला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोषी ठरवत २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


राजकीय वातावरण तापले, सरकारची भूमिका काय?


  न्यायालयाच्या या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अजित पवार गटातील एका मंत्र्यावर ही कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस गोंधळात सापडली आहे. या घटनेवर भाजप आणि शिंदे गटाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

  मात्र, आता याप्रकरणी त्यांना न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याची माहिती हाती येत असून सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदतही देण्यात आली आहे असे समजते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या