अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी- दहावीला दोन हजार तीनशे परीक्षार्थी;जालन्याच्या भरारी पथकाची भेट

एकूण नऊ परीक्षा केंद्र ;जालन्याच्या भरारी पथकाची भेट



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  घनसावंगी तालुक्यात आज पासून (ता २१ फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नऊ परीक्षा केंद्रावर एकूण दोन हजार तीनशे ९३ परीक्षार्थी असून परीक्षा सुरळीत सुरू आहेत काल भरारी पथकातील जालन्याचे शिक्षणाधिकारी  (प्राथमिक) दातखीळ, उपशिक्षणाधिकारी देशमुख, गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी व पर्यवेक्षक एस आर बरडे यांनी तालुक्यातील पानेवाडी परीक्षा केंद्रावर भेट दिली.

  तालुक्यातील घनसावंगी येथील कै दादासाहेब देशमुख प्रा शाळा, के दत्तासाहेब देशमुख विद्यालय, महात्मा फुले विद्यालय पानेवाडी, सरस्वती भुवन विद्यालय कुंभार पिंपळगाव, शिवाजी विद्यालय कुंभार पिंपळगाव, मत्स्योदरी विद्यालय तीर्थपुरी, एल एस इंग्लिश स्कूल तीर्थपुरी एसपी पाटील इंग्लिश स्कूल तीर्थपुरी, जिल्हा परिषद प्रा शाळा तीर्थपुरी असे एकूण तालुक्यात नऊ परीक्षा केंद्र आहेत 

    या परीक्षा केंद्रावर एकूण २३९३ परीक्षार्थी असून आज मराठी पेपरच्या दिवशी एकूण २३७२ परीक्षार्थी हजर होते तर २२ परीक्षार्थी गैरहजर होते. या नऊ परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, सहसंचालक तसेच सहाय्यक परिवेक्षक व बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांचे अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


  तीर्थपुरी येथील मत्स्योदरी विद्यालय येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत चालू असून गेट बाहेरील पोलिस बंदोबस्त 

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या