घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय

 खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय

पोलीस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोप 


   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथील रहिवासी महादेव त्रिंबक थुटे यांनी आपल्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केलेल्या अर्जात त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटा खुनाचा गुन्हा दाखल करून अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

  महादेव थुटे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या दुसऱ्या पत्नी आशामती आणि मुलगा शिवप्रसाद यांच्यात वाद होतो, ज्यामुळे आशामतीच्या वाईट वागणुकीमुळे शिवप्रसादने आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी तिर्थपुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, मात्र त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. महादेव थुटे यांनी योग्य तपास करण्याची विनंती केली असता, पोलीस अधिकारी साजेद अहेमद यांनी उलट त्यांच्यावर खुनाचा आरोप करत 302 कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केला.


   थुटे यांनी असा आरोप केला आहे की, पोलीस अधिकारी साजेद अहेमद आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळी यांनी मिळून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिवाय, तिर्थपुरी प्रा. आ. केंद्राचे डॉक्टर यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले आहे.

  महादेव थुटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नार्को टेस्ट घेण्यात यावी आणि खोटा गुन्हा रद्द करून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या