अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय

 खोटा गुन्हा दाखल करून अन्याय मागितला पोलीस अधिक्षकांकडे न्याय

पोलीस अधिकाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोप 


   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा खुर्द येथील रहिवासी महादेव त्रिंबक थुटे यांनी आपल्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक कार्यालयात सादर केलेल्या अर्जात त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर खोटा खुनाचा गुन्हा दाखल करून अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

  महादेव थुटे यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या दुसऱ्या पत्नी आशामती आणि मुलगा शिवप्रसाद यांच्यात वाद होतो, ज्यामुळे आशामतीच्या वाईट वागणुकीमुळे शिवप्रसादने आत्महत्या केली. या घटनेनंतर त्यांनी तिर्थपुरी पोलीस स्टेशनला माहिती दिली होती, मात्र त्यावेळी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. महादेव थुटे यांनी योग्य तपास करण्याची विनंती केली असता, पोलीस अधिकारी साजेद अहेमद यांनी उलट त्यांच्यावर खुनाचा आरोप करत 302 कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केला.


   थुटे यांनी असा आरोप केला आहे की, पोलीस अधिकारी साजेद अहेमद आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण माळी यांनी मिळून त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिवाय, तिर्थपुरी प्रा. आ. केंद्राचे डॉक्टर यांचीही भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले आहे.

  महादेव थुटे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून नार्को टेस्ट घेण्यात यावी आणि खोटा गुन्हा रद्द करून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या