अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध

 जालना: आठ महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा अखेर शोध


   जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी, जी १९ एप्रिल २०२४ रोजी शेतात शेळीसाठी चारा आणण्यासाठी गेली होती, अखेर सापडली आहे. तब्बल ८ महिन्यांपासून ती बेपत्ता होती. तिच्या आजोबांनी परतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटकडे वर्ग करण्यात आला होता.

  तपासात, गावातील भागवत शिवाजी कोकाटे नावाचा तरुणही बेपत्ता असल्याचे समजले. कोकाटेचा मोबाईल बंद असल्यामुळे त्याचा ठावठिकाणा शोधणे कठीण झाले होते. मात्र, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने अथक प्रयत्न करून दोघांना संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात शोधून काढले. भागवत कोकाटेने मुलीला पळवून नेऊन तिच्याबरोबर संसार थाटला होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून परतूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

  ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या प्रभारी महिला पोलीस निरीक्षक पूजा कदम व त्यांच्या टीमने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या