घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

स्कूलबसला आग लागून बस जळून खाक; ३५ विद्यार्थी बचावले!

 स्कूलबसला आग लागून बस

 जळून खाक; ३५ विद्यार्थी

 बचावले!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूलबसला अचानक आग लागून यात बस जळून खाक झालीय तर सुदैवाने यातील ३५ विद्यार्थी खाली उतरविण्यात आल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. सदरील घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज दि १८ डिसेंबर बुधवार रोजी घडलीय.


   भराडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या चौथी ते सातविच्या विद्यार्थ्यांना परिसरातील गावांतून आमठाणा गावाजवळ अचानक स्कूलबसमधून धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालक व बसमधील दोन शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. अचानक या बसने पेट घेतला व काही वेळातच बस पूर्णतः खाक झाली. 

   बसला आग लागल्याचे कळताच यातील ३५ विद्यार्थ्यांना बसबाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर लगेचच बसने मोठा पेट घेतला. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीतून पाइपद्वारे पाणी मारले मात्र तोपर्यंत बस खाक झाली. विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग, टिफिन आगीत जळाले आहेत. त्यानंतर दुसरी बस मागवून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले.

   या घटनेमुळे चिंतित झालेल्या पालकांनी शाळा गाठून संस्थाचालक, शिक्षक आणि स्कूल बसचालक, मालकाला यांच्या बद्दल संताप व्यक्त केला. बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थली मिळाली.

   दरम्यान या घटनेमुळे सुदैवाने जरी जीवित हानी वा कुनालाहि इजा झाली नसली तरी या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या