अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

स्कूलबसला आग लागून बस जळून खाक; ३५ विद्यार्थी बचावले!

 स्कूलबसला आग लागून बस

 जळून खाक; ३५ विद्यार्थी

 बचावले!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका स्कूलबसला अचानक आग लागून यात बस जळून खाक झालीय तर सुदैवाने यातील ३५ विद्यार्थी खाली उतरविण्यात आल्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एकदा ऐरणीवर आला आहे. सदरील घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज दि १८ डिसेंबर बुधवार रोजी घडलीय.


   भराडी येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या चौथी ते सातविच्या विद्यार्थ्यांना परिसरातील गावांतून आमठाणा गावाजवळ अचानक स्कूलबसमधून धूर येऊ लागला. ही बाब लक्षात येताच चालक व बसमधील दोन शिक्षिकांनी सर्व विद्यार्थ्यांना बसमधून खाली उतरवले. अचानक या बसने पेट घेतला व काही वेळातच बस पूर्णतः खाक झाली. 

   बसला आग लागल्याचे कळताच यातील ३५ विद्यार्थ्यांना बसबाहेर काढण्यात आले त्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. त्यानंतर लगेचच बसने मोठा पेट घेतला. आग विझविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीतून पाइपद्वारे पाणी मारले मात्र तोपर्यंत बस खाक झाली. विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग, टिफिन आगीत जळाले आहेत. त्यानंतर दुसरी बस मागवून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यात आले.

   या घटनेमुळे चिंतित झालेल्या पालकांनी शाळा गाठून संस्थाचालक, शिक्षक आणि स्कूल बसचालक, मालकाला यांच्या बद्दल संताप व्यक्त केला. बसमधील वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची माहिती घटनास्थली मिळाली.

   दरम्यान या घटनेमुळे सुदैवाने जरी जीवित हानी वा कुनालाहि इजा झाली नसली तरी या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या