घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

उमेदवार-कार्यकर्ते गावात शेतकरी राजा वावरात ! मतदार शोधताशोधता नेत्यासह कार्यकर्त्यांची दमछाक

 उमेदवार - कार्यकर्ते गावात
 शेतकरी राजा वावरात !

 मतदार शोधताशोधता
 नेत्यासह कार्यकर्त्यांची
 दमछाक 

 ऊस लागवड, कापूस वेचणी, रब्बीत शेतकरी व्यस्त..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर पाच वर्षाला अनेक निवडणुका येत असतात आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलिय. एकीकडे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांना लोकशाहीचा महोत्सव म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे सर्वसामान्य श्रमजीवी, शेतमजूर मतदारराजाला या समारंभाचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र सध्या तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण परिसरात दिसून येत आहे. 

  कारण उमेदवार व भावी आमदाराचे कार्यकर्ते गावात. फिरताना दिसत आहेत तर शेतकरी आपल्या वर्षभराचा सरमाया जमा करण्यासाठी पहाटेपासून सांजपर्यंत बांधावर राबत आहे. यामुळे प्रचार करणाऱ्या कार्यकत्यांची अडचण झाली आहे. उमेदवारांना आत्ता बांधावर जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे.

  बदलत्या राजकीय वातावरणात निवडणुका म्हटल्या की, पंधरा वीस दिवस आलिशान जेवणाची व्यवस्था, फिरण्यासाठी चार चाकी वाहन, पांढरेशुभ्र कपडे, ज्या परिसरात आपण प्रचारासाठी जात आहोत तो संपूर्ण परिसर आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास अशा ऐटीत मिरवून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. परंतु गंमत अशी की सध्या शेतशिवार कापसाने पांढरे झाले ओ. कापूस वेचणीस मजूर दिसत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्या पासून जमीनदारापर्यंत सर्वच शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला भिडले आहेत.

    गावानुसार आराखडा ठरवून प्रचाराची आखणी केलेल्या उमेदवार कार्यकत्यांना गावात कुणीच गवसत नसल्याने हाताश होऊन परतावं लागतंय काही कार्यकर्ते मात्र शेतात जाऊन शेतकरी राजाला भेटून प्रचार करत आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात तरी निवडणुकीची धामधूम पाहिजे तेवढी दिसायला तयार नाही. खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार बाजी मारणार, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल हेही कळत नसल्याने कार्यकत्यांमध्ये बेचैनी तर उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार शेतकऱ्यांच्य बांधावर अशी म्हणण्याची वेळ सध्या तरी आली आहे.

 गाव पुढाऱ्यांची झाली पंचायत..

  नव्वदच्या दशकात निवडणुका आल्या की गाव पुढाऱ्याचे भाव वाढले जायचे. संपूर्ण गावाच्या मतांचा गठ्ठा आपल्याच तिजोरीत ठेवल्यागत वावर असायचा. परंतु बदलत्या काळानुसार गल्लीबोळात कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. पुढाऱ्यांच्या बैठका पुरातन खाती जमा होऊन नवख्यांचे प्रचारात फाईव्ह जी वर्चस्व स्थापित झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची रसद थेट गावं पुढाऱ्यांच्या हातात पडतं नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली आहे. चहा पानाच्या खर्चासाठी त्यांना चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या