अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

उमेदवार-कार्यकर्ते गावात शेतकरी राजा वावरात ! मतदार शोधताशोधता नेत्यासह कार्यकर्त्यांची दमछाक

 उमेदवार - कार्यकर्ते गावात
 शेतकरी राजा वावरात !

 मतदार शोधताशोधता
 नेत्यासह कार्यकर्त्यांची
 दमछाक 

 ऊस लागवड, कापूस वेचणी, रब्बीत शेतकरी व्यस्त..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दर पाच वर्षाला अनेक निवडणुका येत असतात आता विधानसभेची निवडणूक येऊ घातलिय. एकीकडे प्रशासकीय स्तरावर निवडणुकांना लोकशाहीचा महोत्सव म्हणून पाहिले जाते तर दुसरीकडे सर्वसामान्य श्रमजीवी, शेतमजूर मतदारराजाला या समारंभाचे काहीएक देणेघेणे नसल्याचे चित्र सध्या तरी घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण परिसरात दिसून येत आहे. 

  कारण उमेदवार व भावी आमदाराचे कार्यकर्ते गावात. फिरताना दिसत आहेत तर शेतकरी आपल्या वर्षभराचा सरमाया जमा करण्यासाठी पहाटेपासून सांजपर्यंत बांधावर राबत आहे. यामुळे प्रचार करणाऱ्या कार्यकत्यांची अडचण झाली आहे. उमेदवारांना आत्ता बांधावर जाऊन प्रचार करण्याची वेळ आली आहे.

  बदलत्या राजकीय वातावरणात निवडणुका म्हटल्या की, पंधरा वीस दिवस आलिशान जेवणाची व्यवस्था, फिरण्यासाठी चार चाकी वाहन, पांढरेशुभ्र कपडे, ज्या परिसरात आपण प्रचारासाठी जात आहोत तो संपूर्ण परिसर आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास अशा ऐटीत मिरवून उमेदवार व कार्यकर्ते प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. परंतु गंमत अशी की सध्या शेतशिवार कापसाने पांढरे झाले ओ. कापूस वेचणीस मजूर दिसत नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्या पासून जमीनदारापर्यंत सर्वच शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला भिडले आहेत.

    गावानुसार आराखडा ठरवून प्रचाराची आखणी केलेल्या उमेदवार कार्यकत्यांना गावात कुणीच गवसत नसल्याने हाताश होऊन परतावं लागतंय काही कार्यकर्ते मात्र शेतात जाऊन शेतकरी राजाला भेटून प्रचार करत आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण भागात तरी निवडणुकीची धामधूम पाहिजे तेवढी दिसायला तयार नाही. खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार बाजी मारणार, मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने असेल हेही कळत नसल्याने कार्यकत्यांमध्ये बेचैनी तर उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. मतांचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार शेतकऱ्यांच्य बांधावर अशी म्हणण्याची वेळ सध्या तरी आली आहे.

 गाव पुढाऱ्यांची झाली पंचायत..

  नव्वदच्या दशकात निवडणुका आल्या की गाव पुढाऱ्याचे भाव वाढले जायचे. संपूर्ण गावाच्या मतांचा गठ्ठा आपल्याच तिजोरीत ठेवल्यागत वावर असायचा. परंतु बदलत्या काळानुसार गल्लीबोळात कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. पुढाऱ्यांच्या बैठका पुरातन खाती जमा होऊन नवख्यांचे प्रचारात फाईव्ह जी वर्चस्व स्थापित झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रचाराची रसद थेट गावं पुढाऱ्यांच्या हातात पडतं नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली आहे. चहा पानाच्या खर्चासाठी त्यांना चातकाप्रमाणे वाट पाहावी लागत असल्याचे चित्र दिसून येते आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या