अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

तीर्थपुरीत चोरट्यांचा दोन ठिकाणी डल्ला मारून १ लाख ३० हजाराचा ऐवज केला लंपास

 पोलीस निवडणूक कामात चोरटे जोमात !

तीर्थपुरीत चोरट्यांचा दोन

 ठिकाणी डल्ला १ लाख ३०

 हजाराचा ऐवज केला लंपास 

  एकीकडे महसूल विभाग व पोलीस विभाग निवडणूक कामात असताना दुसरीकडे चोरटे मात्र जोमात असल्याचे दिसून आलंय कान घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे चोरट्याने दोन ठिकाणी डल्ला मारून एक लाख तीस हजाराचा ऐवज लंपास केलाय. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 यात गोरख नामदेव जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की रा काल दि २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी १० वाजेच्या सुमारास मी व माझी पत्नी आईवडील असे जेवन करुन घराचा दरवाजा उघडा ठेवुन घरात झोपी गेलो होते

  आज २१ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास झोपेतून उवलो त्यावेळी माझी आई सविता जाधव ही मला म्हणाली की आपल्या घरातील लोखंडी संदूक घरासमोर असलेल्या मारवत्वाच्या शेतात पडलेला दिसत आहे व त्यातील सामान अस्थाव्यस्त झालेले आहे त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी गेलो व पाहीले असता सदर संदुक आमचाच होता त्यामधील नगदी रुपये व सोन्याचे दागीने चोरी गेल्याचे विसल्याने आम्ही शोध घेत असतांना समजले की साबळा मारोती गुजाळ रा. तिर्थपुरी ता. घनसावंगी जि. जालना यांचे पण नगदी रुपये व सोन्याचे दागीने कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलें आहे.

    यात गोरख जाधव यांचे नगदी ३० हजार रुपये, ४० हजाराचे झुंबर, दोन काळ्या मन्याची पोत, व ज्यामध्ये सोन्याचे मणी व पत्ता, सावळा मारोती गुंजाळ याचे नगदी ४० हजार रुपये, २० हजार रुपयांचे सोन्याचे झुंबर, एक काळ्या मन्याची पोत, व ज्यामध्ये सोन्याचे मणी व पत्ता असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय. याप्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या