घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार - ऊसाच्या दबावाला बळी पडू नका डॉ. हिकमतदादा उढाण


    ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक

 टन ऊस गाळप करणार -

 ऊसाच्या दबावाला बळी

 पडू नका डॉ. हिकमतदादा

 उढाण 

 "पुढील वर्षी ब्ल्यू सफायर चे दोन्हीं युनिट मिळून तब्बल ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून, आता कुणीही कोणत्याही प्रकारच्या व ऊसाच्या दबावाला बळी पडू नका," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमतदादा उढाण यांनी १५ ओन्हेंबर रोजी राणी  उंचेगाव सर्कल मधील मानेपुरी, मुढेगाव, दैठणा, सावरगाव, आंतरवाली-राठी, तळेगाव, चापडगाव, आंतरवाली दाई येथील प्रचार दौरा प्रसंगी केले.


    उढाण यांनी स्पष्ट केले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून योग्य तो भाव देण्यास कटिबद्ध आहोत. "शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतपणे कारखान्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले.

“आम्ही शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन करू आणि त्यांना हक्काचा नफा मिळवून देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.

   शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम राबवण्याचा विचार कारखाना करत आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणासह ऊसाच्या अधिक गाळपाची क्षमता निर्माण केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास गतीने होईल असा विश्वास डॉ. उढाण यांनी व्यक्त केला.

   महायुतीचे अधिकृत उमेदवार हिकमत बळीराम उढान यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते पंडित भुतेकर.


    जि प उपाध्यक्ष महेंद्र पवार, जि प सदस्य जयमंगल  जाधव, शिवसंग्राम चे प्रवक्ते लक्ष्मण नवले व कल्याणीताई गजानन तौर यांनी अनेक गावात भेटी देऊन  हिकमत दादा उढान यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या