अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार - ऊसाच्या दबावाला बळी पडू नका डॉ. हिकमतदादा उढाण


    ब्ल्यू सफायर ९ लाख मेट्रिक

 टन ऊस गाळप करणार -

 ऊसाच्या दबावाला बळी

 पडू नका डॉ. हिकमतदादा

 उढाण 

 "पुढील वर्षी ब्ल्यू सफायर चे दोन्हीं युनिट मिळून तब्बल ९ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून, आता कुणीही कोणत्याही प्रकारच्या व ऊसाच्या दबावाला बळी पडू नका," असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. हिकमतदादा उढाण यांनी १५ ओन्हेंबर रोजी राणी  उंचेगाव सर्कल मधील मानेपुरी, मुढेगाव, दैठणा, सावरगाव, आंतरवाली-राठी, तळेगाव, चापडगाव, आंतरवाली दाई येथील प्रचार दौरा प्रसंगी केले.


    उढाण यांनी स्पष्ट केले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून योग्य तो भाव देण्यास कटिबद्ध आहोत. "शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतपणे कारखान्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवावा," असे आवाहन त्यांनी केले.

“आम्ही शेतकऱ्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन करू आणि त्यांना हक्काचा नफा मिळवून देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.

   शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम राबवण्याचा विचार कारखाना करत आहे. कारखान्याच्या आधुनिकीकरणासह ऊसाच्या अधिक गाळपाची क्षमता निर्माण केली जाणार असून, यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास गतीने होईल असा विश्वास डॉ. उढाण यांनी व्यक्त केला.

   महायुतीचे अधिकृत उमेदवार हिकमत बळीराम उढान यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते पंडित भुतेकर.


    जि प उपाध्यक्ष महेंद्र पवार, जि प सदस्य जयमंगल  जाधव, शिवसंग्राम चे प्रवक्ते लक्ष्मण नवले व कल्याणीताई गजानन तौर यांनी अनेक गावात भेटी देऊन  हिकमत दादा उढान यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या