घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही " कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही - डॉ. हिकमत दादा

 आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही "

 कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन

 शपथ घ्यायला लावली नाही - 

डॉ. हिकमत दादा

डॉ. हिकमत दादा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सत्यनिष्ठेची आणि प्रामाणिकपणाची जाहीरपणे ग्वाही दिली. एका आजीला भेटल्या नंतर ते म्हणाले, "आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि परिवाराने दिलेल्या उत्तम संस्कारांमुळे मला कधीच ज्वारी हातात धरून शपथ घ्यावी लागली नाही."

त्यांनी स्पष्ट केलं की, "मी कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही, आणि भविष्यातही असं करणार नाही." या वक्तव्याने त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर असलेला ठाम विश्वास व्यक्त केला.

"आपल्या थोरामोठ्यांचं निखळ प्रेम आणि असीम विश्वास हेच माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे," असंही ते म्हणाले.

डॉ. हिकमत दादा यांनी आपल्या घनसावंगी मतदारसंघातील सर्व कुटुंबांचा स्वाभिमान जपण्याचं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याचं वचन दिलं. त्यांच्या नेतृत्वाने मतदारसंघातील लोकांचा विश्वास जिंकण्यास मोठं योगदान दिलं असून, या वक्तव्यानंतर मतदारसंघात त्यांच्या निष्ठेचं प्रतिबिंब अधिक दृढ झालं आहे.

डॉ. हिकमत दादा यांचे हे विधान त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये आपुलकी निर्माण करतं. आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान टिकवणं, वाढवणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

  यामुळे मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या