अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही " कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही - डॉ. हिकमत दादा

 आयुष्यात "कधीही खोटं बोललो नाही "

 कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन

 शपथ घ्यायला लावली नाही - 

डॉ. हिकमत दादा

डॉ. हिकमत दादा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या सत्यनिष्ठेची आणि प्रामाणिकपणाची जाहीरपणे ग्वाही दिली. एका आजीला भेटल्या नंतर ते म्हणाले, "आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि परिवाराने दिलेल्या उत्तम संस्कारांमुळे मला कधीच ज्वारी हातात धरून शपथ घ्यावी लागली नाही."

त्यांनी स्पष्ट केलं की, "मी कधीही कुणालाही ज्वारी हातात घेऊन शपथ घ्यायला लावली नाही, आणि भविष्यातही असं करणार नाही." या वक्तव्याने त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर असलेला ठाम विश्वास व्यक्त केला.

"आपल्या थोरामोठ्यांचं निखळ प्रेम आणि असीम विश्वास हेच माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे," असंही ते म्हणाले.

डॉ. हिकमत दादा यांनी आपल्या घनसावंगी मतदारसंघातील सर्व कुटुंबांचा स्वाभिमान जपण्याचं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत राहण्याचं वचन दिलं. त्यांच्या नेतृत्वाने मतदारसंघातील लोकांचा विश्वास जिंकण्यास मोठं योगदान दिलं असून, या वक्तव्यानंतर मतदारसंघात त्यांच्या निष्ठेचं प्रतिबिंब अधिक दृढ झालं आहे.

डॉ. हिकमत दादा यांचे हे विधान त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये आपुलकी निर्माण करतं. आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान टिकवणं, वाढवणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणं हेच त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

  यामुळे मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, अशी अपेक्षा आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या