अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी मिळणार खरीप पिक विमा

 जालना जिल्ह्यातील

 शेतकऱ्यांना कधी  मिळणार

 खरीप पिक विमा !


पीक विम्याची ४१२.३० कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार..! 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


  प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मुग व उडिद या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे जालना जिल्ह्यातील ४१२.३० कोटींची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिली होती मात्र अद्याप पर्यंत नोव्हेंबर महिना संपत आला तरीही पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही.

   जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पिक नुकसानी बाबत एकूण ४ लाख ८७ हजार ८३४ पूर्वसूचना विमा कंपनीस प्राप्त झालेले आहे. त्यानुषंगाने युनिव्हर्सल - सोंपो जनरल इंन्शुरन्स कंपनीस पिक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे बाबत सूचना देण्यात आलेल्या असून त्यानुसार कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली होती.

  जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यानचे सरासरी पर्जन्यमान ६०३.१ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये ८१२.४ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याधी सरासरीच्या तुलनेत १३४.९ टक्के इतकी आहे. जालना जिल्ह्याचे माहे सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान १४१.८ मिमी. इतके असून सन २०२४-२५ मध्ये २२१६.९ मिमी. इतका पाऊस पडलेला आहे व त्याची टक्केवारी सरासरीच्या तुलनेत १६० १ टक्के इतकी आहे. माहे सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, ढगफुटी व पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडिद, फळपिकांचे असे एकूण २ लाख ५५ हजार ५१९.९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. त्यानुसार २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांना ४१२.३० कोटी रक्कमेची नुकसान अनुदानाबाबतची मागणी शासनाकडे केली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिली होती.

  मात्र आता नोव्हेंबर महिना संपत आला तरीही पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही म्हणून ही रक्कम कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


प्रतिक्रिया 


   जालना जिल्ह्यातील खरीप २०२४ पिक विम्याचे अनुषंगाने जवळपास ६ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या असून संबंधित विमा कंपनीकडून सर्वे पूर्ण करून कंपनीला तात्काळ विमा वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा रक्कम मिळेल.


   – जे. आर. कापसे, जिल्हा कृषी अधीक्षक जालना


  अग्रीम पिक विमा आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची आर्थिक मदत शेतकऱ्यांना आठ दिवसात तात्काळ अदा करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.


 –सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या