अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

जालन्यात सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा खून !

 जालन्यात सेवानिवृत्त बँक


 कर्मचाऱ्यांचा खून !


 जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा रात्री निर्गुण खून केल्याची घटना उघडकीस आली. खुनाचे कारण मात्र समजू शकले नाही.

   काल दि २० नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शिरढोण येथे सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांचा खून केला असल्याची घटना उघडकीस आलीय.

    शिरढोण कडून अंबड कडे येणाऱ्या अंबड शहरातील नूतन वसाहत येथील रहिवाशी तथा पीपल्स बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा काल रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणास चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केलाय अशी उघडकीस आली.

  घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे, अंबड ठाणेदार सतीश जाधव, पीएसआय गुरले व अन्य सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिलीय. सपकाळ यांचा मृतदेह खाजगी वाहनातून अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला.

 याप्रकरणी अंबड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खुणाचा तपासाची प्रक्रिया चालू झाली आहे . यांचा खून कोणी केलाय, कशामुळे केलाय याचे करण मात्र अस्पष्ट असू. तपासण्याचे पोलिसांकडे मोठे आव्हान आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या