घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

बसचा भीषण अपघात १० जण ठार २० जण गंभीर..!

 बसचा भीषण अपघात १० जण ठार २० जण गंभीर..!



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  एका खासगी बसचा भीषण अपघात होउन १० जण ठार तर २० जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज २० ऑक्टोबर रोजी दुपार च्या सुमारस घडलीय. या खाजगी बसमध्ये ४० प्रवाशी होते.

 सदरील दुर्दैवी घटना राजस्थानच्या सीकरमध्ये घडलीय आज दुपारच्या सूमारास सीकर जिल्ह्याच्या लक्ष्मण गढ परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खाजगी ताबा सुटल्यामुळे पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. या घटनेत बसचा चक्काचूर झाला असून बसमध्ये ४० प्रवाशी होते यातील १० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. तसेच २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

    जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण आलेय या बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून मात्र बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

    सीकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शीने या अपघाताबाबत बोलताना सांगितले की बस प्रचंड वेगात होती, अचानक अनियंत्रित झाली आणि पुलाच्या भिंतीला जाऊन धडकली. या अपघातामध्ये १० प्रवाशांचा मृत्यू झालाय तर २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत.

    हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या