घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

 राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   घनसावंगी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज मा.खा.अमोल कोल्हे, मा.खा.संजय जाधव, मा.खा.डॉ. कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल केला.


   घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तुमचं आणि माझ नात हे जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे असल्याचे तुम्ही आज पुन्हा एकदा अधोरेखित करून माझ्यातला आत्मविश्वास लाख पटीने वाढवलात. 

   स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई जिंकण्यासाठी ताकतीने मैदानात उतरण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे आजच्या गर्दीतून आपण सिद्ध करून दाखवलत.हीच मायेची - प्रेमाची शिदोरी घेऊन तुमच्यासाठी जीव ओतून काम करेल हा शब्द या निमित्ताने देतो.

  कोरोना काळात केलेलं कार्य ही माझी जबाबदारी होती.ही जबाबदारी तुमच्या विश्वासाच्या जोरावर मला पूर्ण करता आली. पुढे देखील जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण मला संधी द्याल ही खात्री आहे. योजनांचे गाजर दाखवून या जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.तुम्हाला - मला आता विरोधकांना जाब विचारायची हीच ती वेळ आहे. ते फसव्या योजना दाखवतील परंतु तुम्ही शेतीमालाला हमीभाव नाही, युवकांच्या हाताला रोजगार नाही, आपल्या माता - भगिनी सुरक्षित नाहीत हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. असे शेवटी राजेश टोपे यांनी सांगितले.

Comments

  1. या वेळी घनसावंगी ची सत्ता बदल होणार च

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या