अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

 राजेश टोपे यांचा उमेदवारी अर्ज दाखल..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   घनसावंगी मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज मा.खा.अमोल कोल्हे, मा.खा.संजय जाधव, मा.खा.डॉ. कल्याण काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल केला.


   घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज राजेश टोपे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तुमचं आणि माझ नात हे जिव्हाळ्याचे आणि आपलेपणाचे असल्याचे तुम्ही आज पुन्हा एकदा अधोरेखित करून माझ्यातला आत्मविश्वास लाख पटीने वाढवलात. 

   स्वाभिमानाची आणि निष्ठेची लढाई जिंकण्यासाठी ताकतीने मैदानात उतरण्यासाठी तुम्ही सज्ज झालात हे आजच्या गर्दीतून आपण सिद्ध करून दाखवलत.हीच मायेची - प्रेमाची शिदोरी घेऊन तुमच्यासाठी जीव ओतून काम करेल हा शब्द या निमित्ताने देतो.

  कोरोना काळात केलेलं कार्य ही माझी जबाबदारी होती.ही जबाबदारी तुमच्या विश्वासाच्या जोरावर मला पूर्ण करता आली. पुढे देखील जनतेचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण मला संधी द्याल ही खात्री आहे. योजनांचे गाजर दाखवून या जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.तुम्हाला - मला आता विरोधकांना जाब विचारायची हीच ती वेळ आहे. ते फसव्या योजना दाखवतील परंतु तुम्ही शेतीमालाला हमीभाव नाही, युवकांच्या हाताला रोजगार नाही, आपल्या माता - भगिनी सुरक्षित नाहीत हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे. असे शेवटी राजेश टोपे यांनी सांगितले.

Comments

  1. या वेळी घनसावंगी ची सत्ता बदल होणार च

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या