घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

माझी उमेदवारी हे जनतेचे माझ्यावरील प्रेम व विश्र्वास आहे - हिकमत उढाण

 माझी उमेदवारी हे जनतेचे माझ्यावरील प्रेम व विश्र्वास आहे - हिकमत उढाण 

घोन्सी व बेलवाडी येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश..




    शिवसेना पक्षातर्फे एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याचे पत्रक मिळाले हे माझ्यासाठी केवळ उमेदवारी नाही, तर जनतेचे माझ्यावरचे प्रेम आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया हिकमत उढाण यांनी उमेदवारी मिळाल्या नंतर दिलीय.

   पुढे बोलतांना उढाण म्हणले की माझे जीवन हे जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. या उमेदवारीमुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करणे , रोजगार निर्माण करणे, शिक्षणात सुधारणा करणे तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे मुद्दे घेऊन प्रयत्नशील राहणार आहे.

  तुमच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे. तुमच्या आशीर्वादाने आणि समर्थनाने अधिक जोमाने तुमच्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करत आहे असे शेवटी सांगितलेय.

  यावेळी मतदरसंघातील घोन्सी व बेलवाडी येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या