अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली !

 काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली ! 



वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  अनेवेळा विवीध भयानक अशा घटना घडताना दिसतात काही वेळा काळ आला होता पण वेळ आली नव्हती एस टी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली ! अशीच घटना आज ३१ ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये घडलीय.

    जिल्ह्यातील तेर - ढोकी रस्त्यावरील तेरणा नदीच्या पुलावर आज ३१ ऑक्टोबर रोजी एका राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात होता होता वाचलाय बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाच्या कठड्याला जोरदार धडकली पण सुदैवाने बस पुलावरून नदीपात्रात कोसळण्यापासून वाचली.



   या अपघातात एसटी बस मधील १० ते १७ प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.

  प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस पुलावरून खाली पडण्यापासून वाचवली. या अपघातामुळे प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अपघाताची अधिक चौकशी पोलीस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या