अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी तालुक्यात तीन तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू !


घनसावंगी तालुक्यात तीन

 तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू


ऐन दिवाळी सणावर दुःखाचे सावट..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी तीन तरुणांचा एकाच दिवशी दुपारीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय ऐन दिवाळी सणाच्या कालावधीतच या तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे दुःखाचा सावट पसरले. यात दोन जणांचा दिर्घ आजारपणामुळे मृत्यू तर एकाने विषारी द्रव्य सेवन केले होते.

  आज ३१ ऑक्टोबर गुरवार रोजी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील राजु चांदपाशा शेख वय ३७ वर्षे याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील दवाखान्यात दुपारी उपचाादरम्यान मृत्यू झाला आहे व रविंद्र लक्ष्मण काटकर वय २८ वर्ष याचा गावातच दिर्घ आजाराने दुपारीच निधन झाले. तर कोठी येथील ज्ञानेश्वर कांता कदम वय ३३ याने दोन दिवसापूर्वी आपल्या घरी विषारी द्रव्य सेवन केले होते त्याला पुढील उपचारांसाठी जालना येथून छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले होते परंतु आज दुपारी त्याचा मृत्यू झाला. 

   दरम्यान ऐन दिवाळी सणाच्या कालावधीतच या तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे आंतरवाली टेंभी व कोटी येथे दुःखाचे सावट पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या