अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..!

 कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..!

कार्यकर्त्याकडून विविध पदव्या बहाल...

सोशल मीडियावर नेतेमंडळी सह कार्यकर्त्यांचा धुमाकूळ...

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अपक्ष सह इतर राजकीय संघटना व सामाजिक संघटना यांचे गेल्या कित्येक वर्षापासून गायब असलेले कार्यकर्ते नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर त्यांच्या अनेक पोस्ट वायरल होताना दिसून येत आहेत. 

   निवडणुकी म्हटलं की कार्यकर्त्यांचं चांगभलं होताना दिसून येत आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या तसेच अपक्ष इतर राजकीय व सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते आपल्या नेते मंडळींना सोशल मीडियावर मोठमोठ्या पदव्या बहाल करत असून सद्यस्थितीत सोशल मीडियावर या नेतेमंडळींचा धुमाकूळ चालला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक नेतेमंडळी पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे निवडणूक ते निवडणूक त्या कालावधीतच जनतेसमोर येत असून दुसरीकडे त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते मात्र या नेतेमंडळींना नको त्या पदव्या बहाल करून आमचे नेते कसे चांगले हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत.

 काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेते मंडळीला विकासाचे महामेरू, विकासाची जाण असणारे, विकसभिमुख नेतृत्व अशा विविध पदव्या देऊन गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या नेत्यांनी एवढा सारा विकास केला असा गाजावाजा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे मात्र जर या नेते मंडळींनी एवढा विकास कामे केली तर त्यांना निवडणुकांमध्ये प्रचार करायची गरजच का भासते असा प्रश्नही दुसरीकडे उपस्थित होत आहे

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या