घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..!

 कित्येक वर्षापासून गायब असलेले नेते सोशल मीडियावर झळकू लागले..!

कार्यकर्त्याकडून विविध पदव्या बहाल...

सोशल मीडियावर नेतेमंडळी सह कार्यकर्त्यांचा धुमाकूळ...

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष अपक्ष सह इतर राजकीय संघटना व सामाजिक संघटना यांचे गेल्या कित्येक वर्षापासून गायब असलेले कार्यकर्ते नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर त्यांच्या अनेक पोस्ट वायरल होताना दिसून येत आहेत. 

   निवडणुकी म्हटलं की कार्यकर्त्यांचं चांगभलं होताना दिसून येत आहे यामुळे प्रत्येक पक्षाच्या तसेच अपक्ष इतर राजकीय व सामाजिक संघटना यांचे कार्यकर्ते आपल्या नेते मंडळींना सोशल मीडियावर मोठमोठ्या पदव्या बहाल करत असून सद्यस्थितीत सोशल मीडियावर या नेतेमंडळींचा धुमाकूळ चालला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक नेतेमंडळी पावसाळ्यातील छत्र्याप्रमाणे निवडणूक ते निवडणूक त्या कालावधीतच जनतेसमोर येत असून दुसरीकडे त्यांचे बगलबच्चे कार्यकर्ते मात्र या नेतेमंडळींना नको त्या पदव्या बहाल करून आमचे नेते कसे चांगले हे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसून येत आहेत.

 काही कार्यकर्त्यांनी आपल्या नेते मंडळीला विकासाचे महामेरू, विकासाची जाण असणारे, विकसभिमुख नेतृत्व अशा विविध पदव्या देऊन गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या नेत्यांनी एवढा सारा विकास केला असा गाजावाजा सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे मात्र जर या नेते मंडळींनी एवढा विकास कामे केली तर त्यांना निवडणुकांमध्ये प्रचार करायची गरजच का भासते असा प्रश्नही दुसरीकडे उपस्थित होत आहे

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या