अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!

 नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील. कन्नड तालुक्यात तीन युवकांचा पूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ३० ऑक्टोबर रोजी घडलीय.आवेज नवीद पटेल, अफरोज सिराज पठाण, अल्ताफ राजू पटेल अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

   कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे ३० ऑक्टोबर बुधवारी दुपारच्या सुमारास तिघे युवक पोहण्यासाठी नदीत उतरले होते. तिघे गावाजवळील पूर्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीतील सिमेंट बंधाऱ्याच्या खाली उतरून पोहू लागले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आवेज नवीद पटेल वय २१, अफरोज सिराज पठाण वय २३ , अल्ताफ राजू पटेल वय १९ (रा तिघेही शेलगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

   त्यांचा आणखी एक मित्र नदीवर आला असता त्याने एकाला कॉल केला. मात्र फोन नदीकाठी काढलेल्या पँटच्या खिशात वाजू लागल्याने ही घटना उघडकीस आलीय ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचा शोध घेतला व मृतदेह बाहेर काढले.

   चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान दिवाळीच्या सणासुदीच्या काळातच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या