घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!

 नदीत बुडून ३ युवकांचा दुर्दैवी मृत्यू..!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील. कन्नड तालुक्यात तीन युवकांचा पूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल ३० ऑक्टोबर रोजी घडलीय.आवेज नवीद पटेल, अफरोज सिराज पठाण, अल्ताफ राजू पटेल अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

   कन्नड तालुक्यातील शेलगाव येथे ३० ऑक्टोबर बुधवारी दुपारच्या सुमारास तिघे युवक पोहण्यासाठी नदीत उतरले होते. तिघे गावाजवळील पूर्णा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीतील सिमेंट बंधाऱ्याच्या खाली उतरून पोहू लागले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले आवेज नवीद पटेल वय २१, अफरोज सिराज पठाण वय २३ , अल्ताफ राजू पटेल वय १९ (रा तिघेही शेलगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

   त्यांचा आणखी एक मित्र नदीवर आला असता त्याने एकाला कॉल केला. मात्र फोन नदीकाठी काढलेल्या पँटच्या खिशात वाजू लागल्याने ही घटना उघडकीस आलीय ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचा शोध घेतला व मृतदेह बाहेर काढले.

   चिंचोली लिंबाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. दरम्यान दिवाळीच्या सणासुदीच्या काळातच ही दुर्दैवी घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या