अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

दिवाळी सणावर कापूस वेचणीचे विघ्न, मजुरांची टंचाई ठरयेतय कुटुंबावर संकट !महीला पुरुषास बालगोपाल कापूस वेचणीला

 दिवाळी सणावर कापूस वेचणीचे विघ्न, मजुरांची टंचाई ठरयेतय कुटुंबावर संकट !महीला पुरुषास बालगोपाल कापूस वेचणीला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर कापूस वेचणीचे मोठे विघ्न उभे ठाकले आहे. कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना, मजुरांची टंचाई हा शेतकऱ्यांसाठी मोठा अडसर ठरत आहे. परिणामतः घनसावंगी तालुक्यातील शेतकरी महिलांसह पुरुष आणि बालगोपालांनाही दिवाळी निमित्त शाळेच्या सुट्टीचा अंनद घेण्याऐवजी शेतात कापूस वेचण्याचे काम करावे लागत आहे.


  राज्यातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका शाळेत जाणाऱ्या बालगोपाळांसह महिलांनाही बसला असून, त्यांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही. मजुरांची उपलब्धता कमी असल्यामुळे घरातील महिला आणि लहान मुले शेतात कापूस वेचण्यासाठी जाण्यास भाग पाडले जात आहेत.

   ग्रामीण भागात कापूस वेचणीचे काम सध्या जोमात सुरु आहे, मात्र कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबांवरील भार वाढला आहे. दिवाळी सणाच्या दिवसांतही महिला-पुरुषांनी एकत्र कापूस वेचायला सुरुवात केली आहे. दिवाळीचा आनंद कुटुंबासोबत साजरा करण्याऐवजी कापूस वेचण्याच्या घाईगडबडीत वेळ जात आहे.

  कापूस वेचणीच्या हंगामात मजुरांची कमी झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेतात उतरवण्याचे ठरवले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना शिक्षणाचा त्याग करावा लागून कापूस वेचणीसाठी कष्ट करावे लागत आहेत. परिणामी, मुलांना आणि महिलांना दिवाळीच्या सणात घरात राहून आनंद घेण्याची संधी न मिळता दिवसभर शेतात कापूस वेचण्याचे काम करावे लागत आहे.

   स्थानिक महिलांनी सांगितले की, कापूस वेचणीचा दबाव खूप वाढला आहे. घरातील सर्व सदस्य शेतात असल्याने दिवाळीच्या तयारीसाठी वेळ मिळत नाही. मुलांना दिवाळीच्या सुट्टीत खेळण्याऐवजी शेतात काम करावे लागत आहे. "दिवाळीचा आनंद तर दूरच, सणाच्या तयारीलाही वेळ मिळत नाही," अशी भावना एका शेतकरी महिलेने व्यक्त केली.


बालगोपालांच्या शाळेच्या दिवाळी सुट्या शेतामध्येच..!

  दिवाळीच्या सुट्टीत शहरासह ग्रामीण भागातील मुले, मुली फटाके आणि फराळात मग्न असताना, ग्रामीण भागातील बाळगोपाळांची दिवाळी सुट्टया शेतामध्येच जात आहेत. शाळांना सुट्टी असल्यामुळे लहान मुलेदेखील आई-वडिलांसोबत कापूस वेचणीच्या कामात मदत करत आहेत. कापसाचा दर्जा चांगला राखण्यासाठी वेळेवर वेचणी करणे आवश्यक असल्याने, सणाच्या काळातही शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी झटत आहेत.

  मुलांना खेळायला वेळ मिळत नसून, दिवाळीचे फराळही फक्त नाममात्रच अनुभवले जात आहेत. शेतात कापूस वेचणे हेच त्यांच्या सुट्टीचे काम झाले आहे. त्यामुळे ग्रामीण कुटुंबांसाठी या वर्षीची दिवाळी सणाऐवजी कापूस वेचणीचा हंगाम ठरली आहे.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या