घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

दिवाळी सणावर कापूस वेचणीचे विघ्न, मजुरांची टंचाई ठरयेतय कुटुंबावर संकट !महीला पुरुषास बालगोपाल कापूस वेचणीला

 दिवाळी सणावर कापूस वेचणीचे विघ्न, मजुरांची टंचाई ठरयेतय कुटुंबावर संकट !महीला पुरुषास बालगोपाल कापूस वेचणीला


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

  ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर कापूस वेचणीचे मोठे विघ्न उभे ठाकले आहे. कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना, मजुरांची टंचाई हा शेतकऱ्यांसाठी मोठा अडसर ठरत आहे. परिणामतः घनसावंगी तालुक्यातील शेतकरी महिलांसह पुरुष आणि बालगोपालांनाही दिवाळी निमित्त शाळेच्या सुट्टीचा अंनद घेण्याऐवजी शेतात कापूस वेचण्याचे काम करावे लागत आहे.


  राज्यातील शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका शाळेत जाणाऱ्या बालगोपाळांसह महिलांनाही बसला असून, त्यांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही. मजुरांची उपलब्धता कमी असल्यामुळे घरातील महिला आणि लहान मुले शेतात कापूस वेचण्यासाठी जाण्यास भाग पाडले जात आहेत.

   ग्रामीण भागात कापूस वेचणीचे काम सध्या जोमात सुरु आहे, मात्र कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबांवरील भार वाढला आहे. दिवाळी सणाच्या दिवसांतही महिला-पुरुषांनी एकत्र कापूस वेचायला सुरुवात केली आहे. दिवाळीचा आनंद कुटुंबासोबत साजरा करण्याऐवजी कापूस वेचण्याच्या घाईगडबडीत वेळ जात आहे.

  कापूस वेचणीच्या हंगामात मजुरांची कमी झाल्यामुळे, शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना शेतात उतरवण्याचे ठरवले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना शिक्षणाचा त्याग करावा लागून कापूस वेचणीसाठी कष्ट करावे लागत आहेत. परिणामी, मुलांना आणि महिलांना दिवाळीच्या सणात घरात राहून आनंद घेण्याची संधी न मिळता दिवसभर शेतात कापूस वेचण्याचे काम करावे लागत आहे.

   स्थानिक महिलांनी सांगितले की, कापूस वेचणीचा दबाव खूप वाढला आहे. घरातील सर्व सदस्य शेतात असल्याने दिवाळीच्या तयारीसाठी वेळ मिळत नाही. मुलांना दिवाळीच्या सुट्टीत खेळण्याऐवजी शेतात काम करावे लागत आहे. "दिवाळीचा आनंद तर दूरच, सणाच्या तयारीलाही वेळ मिळत नाही," अशी भावना एका शेतकरी महिलेने व्यक्त केली.


बालगोपालांच्या शाळेच्या दिवाळी सुट्या शेतामध्येच..!

  दिवाळीच्या सुट्टीत शहरासह ग्रामीण भागातील मुले, मुली फटाके आणि फराळात मग्न असताना, ग्रामीण भागातील बाळगोपाळांची दिवाळी सुट्टया शेतामध्येच जात आहेत. शाळांना सुट्टी असल्यामुळे लहान मुलेदेखील आई-वडिलांसोबत कापूस वेचणीच्या कामात मदत करत आहेत. कापसाचा दर्जा चांगला राखण्यासाठी वेळेवर वेचणी करणे आवश्यक असल्याने, सणाच्या काळातही शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी झटत आहेत.

  मुलांना खेळायला वेळ मिळत नसून, दिवाळीचे फराळही फक्त नाममात्रच अनुभवले जात आहेत. शेतात कापूस वेचणे हेच त्यांच्या सुट्टीचे काम झाले आहे. त्यामुळे ग्रामीण कुटुंबांसाठी या वर्षीची दिवाळी सणाऐवजी कापूस वेचणीचा हंगाम ठरली आहे.




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या