घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ९९- परतूर, १००-घनसावंगी, १०१ -जालना, १०२- बदनापूर (अ.जा.) आणि १०८-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज २० ऑक्टोबर उमेदवारांनी २६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण २५ उमेदवारांचे ३२ नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
९९-परतूर विधानसभा मतदार संघासाठी ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात आसाराम जिजाभाऊ बोराडे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. १००-घनसावंगी मतदारसंघासाठी ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात राजेश अंकुशराव टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), मनिषाताई राजेशभैय्या टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे. १०१-जालना विधानसभा मतदार संघासाठी ४ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात अर्जुनराव पंडितराव खोतकर (शिवसेना), कैलास किसनराव गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस), संगीता कैलास गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. १०२- बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी ७ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), कुचे नारायण तिलकचंद (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. १०८-भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघासाठी २ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात श्रीरंगराव रंगनाथराव जंजाळ (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे. याप्रमाणे आज एकुण २६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
आजपर्यंत एकूण ३१२इच्छुक उमेदवारांना ७५० नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. २९ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ३ यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे.
बुधवार, दि. ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. ४ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल शनिवार दि. २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी जाहिर केला जाणार आहे.
Comments
Post a Comment