अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

अंबाजोगाई-लातूर मार्गावर झाला भीषण अपघात

स्विफ्टकार व कंटेनरचा भीषण अपघातात होउन चारजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर मार्गावर पहाटे घडलीय.हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झालाय.

स्विफ्टकार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झालाय यामुळे कारमधील चौघेजन ठार झालेत 
बीडच्या अंबाजोगाई - लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात  चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे कार आणि कंटेनरमध्ये टक्कर होऊन हा अपघात घडल्याची माहिती मिळाली यात स्विफ्ट कार मधील मृत्यूमुखी पडलेल्या चौघे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. रात्री मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजी नगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या