घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

कार व कंटेनरचा भीषण अपघातात चार ठार!

अंबाजोगाई-लातूर मार्गावर झाला भीषण अपघात

स्विफ्टकार व कंटेनरचा भीषण अपघातात होउन चारजण जागीच ठार झाल्याची घटना अंबाजोगाई-लातूर मार्गावर पहाटे घडलीय.हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झालाय.

स्विफ्टकार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झालाय यामुळे कारमधील चौघेजन ठार झालेत 
बीडच्या अंबाजोगाई - लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झालेल्या भीषण अपघातात  चार जणांचा मृत्यू झाला. पहाटे कार आणि कंटेनरमध्ये टक्कर होऊन हा अपघात घडल्याची माहिती मिळाली यात स्विफ्ट कार मधील मृत्यूमुखी पडलेल्या चौघे लातूरच्या चाकूर तालुक्यातील रहिवाशी असल्याची माहिती आहे. रात्री मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. मृतांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कारमधून छत्रपती संभाजी नगरहून निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्गाजवळ त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि आतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या