अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतच धरणे आंदोलन !

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतच धरणे आंदोलन !


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

  जालना जिल्ह्यातील घनसांगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत खातेदार व कर्जदार यांच्या विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवारी बँकेतच फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केलय.


शाखा कुंभार पिंपळगाव शाखा व्यवस्थापक मार्फत महाव्यवस्थापक विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा कुंभार पिंपळगाव येथे कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने करण्यात यावे याचा नाहक त्रास खातेदारांना सोसावा लागत असुन शासनाने सुरू केलेल्या योजनांचा लाभ या शाखेत योग्य वेळेत मिळत नाही तसेच खात्यात रक्कम शिल्लक असुन देखील केवळ केवायसी नसल्याने मिळत नाही.

    शाखेत कर्मचारी संख्या वाढवून केवायसी सह इतर कामे तातडीने होण्यासाठी आदेश देण्यात यासह विविध मागण्यांसाठी ३० सप्टेंबर सोमवार रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत धरणे आंदोलन केले आहे या शाखेत व बॅंकेच्या गेट व पायरी वर बसुन हातात मागणी चे फलक ( बोर्ड) घेवून जोर जोरात मागणीची घोषणा देण्यात आल्या यावेळी ग्राम विकास युवा मंच चे पदाधिकारी, खातेदार, कर्जदार मोठया संख्येने उपस्थिती होते.


Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या