अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..!

 गोदावरी नदीपात्रात विसर्गात वाढ..!


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

पैठणच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात आज २५ सप्टेंबर रोजी वाढ करण्यात आली आहे. म्हणून नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे घनसावंगी तहसीलदार यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय.

जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण  दि. २५ -०९ -२०२४  वेळ: ०५:१५ . विसर्ग वाढ करण्यात आली आहे आज रोजी ठिक ०५:३० ते ०६:००  या दरम्यान गेट क्र.  १२,२५ व ११,२६ असे एकुण ४  गेटस  ०.५  फुट उंचीने  वर  करून २०९६  क्युसेक विसर्ग वाढ  करण्यात येणार  आहे.

अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात सांडव्याद्वारे सध्या एकुण ०८ गेटमधुन ४१९२ व वाढीव २०९६ क्युसेक असे एकूण ६२८८  क्युसेक विसर्ग सुरू राहील.  आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल.

 म्हणुन नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे. असे आवाहन जायकवाडी प्रकल्प नाथसागर जलाशय पैठण व घनसावंगी तहसीलदार योगिता खटावकर यांच्या कडून आवाहन करण्यात आलेय.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या