अंबड -घनसावंगी तालुक्यात एकाचा वीज अंगावर पडून तर दुसऱ्याचा शॉक लागून मृत्यू..!
घनसावंगी तालुक्यात वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर अंबड तालुक्यात वीजेचा शाॅक लागुन शाळकरी मुलाचा मृत्यू..!
वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला असून घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली दाई येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे हे शेतातून काम करून घरी परत जात असताना अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडलीय. तर दुसरी घटना अंबङ तालूक्यातील हारतखेङा येथील प्रणव भिकाजी ढवळे (वय ११ वर्षे ) याचा हारतखेडा शिवारातील शेतात गेला असता तेथुन एका तारेला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडलीय.
अंतरवाली दाई ता. घनसावंगी येथील शेतकरी अशोक भागुजी गंदाखे (वय ४० वर्षे) हे सकाळीच आपल्या शेतात गेले होते शेतातून काम करून दुपारच्या सुमरास घरी वापस येत असताना भरत सिताराम गोटे यांच्या गट नंबर ४१ व ४२ च्या मध्ये त्यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या कुटुंबात आई- वडील, मुलगा, पत्नी व मुलगी असा मोठा परिवार आहे या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दुःखाची शोककळा पसरली असून या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर प्राथमिक आरोग्य केंद्र राणी उंचेगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर रात्री अंतरवाली दाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत अंबड तालुक्यात वीजेचा शाॅक लागून
हारतखेङा येथील प्रणव भिकाजी ढवळे (वय ११ वर्षे ) या शाळकरी मुलांचा मृत्यू झालाय हारतखेडा येथील डि .पी.जळालेली होती ती जालाना येथे भरण्यासाठी नेलेली असतांना याच तारेवर गावातील ङिपी मधून दुसर्यांनी लाईट नेलेली होती ते लक्षात आले नाही .प्रणव हा रविवारी आई वङीलासोबत शाळेला सुटी असल्यामुळे शेतात गेला होता बाजूच्या शेतात आई वङिल कपाशीचे पोलन करत होते. त्याच बाजूला शेतातून विधूत तारे गेलेली आहे त्यात एक तार तुटून खाली पङलेला होता त्याच्या लक्षात न आल्याने त्याचा स्पर्श होऊन तार अंगाला चिटकल्या गेल्याणे त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या पच्छात आई, वङील,दोन बहीणी ,चुलते असा परिवार आहे. दरम्यान वीज वितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे या बालकांचा मृत्यू झाला आल्याची महिती नातेवकानी दिलीय.
Comments
Post a Comment