घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी घनसावंगीत आमरण उपोषण 



वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

   घनसांगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तहसील कार्यालय घनसांवगी समोर ३० सप्टेंबर सोमवरी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत तहसीलदार घनसांग यांना निवेदन देण्यात आले. 

    या निवेदनात नमूद केले आहे की घनसांगी तालुक्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासन प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे आमरण उपोषण करण्यात येणार आहे यात सन २०२४ मधील सर्व पिकांचा पिक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा, संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा,  मोसंबी फळगळ नुकसान भरपाई द्यावी, यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जुळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, 

   सन २०२२/२३ मधील ओल्या दुष्काळाचे अनुदान आणखीही जिल्हाभरात हजारो शेतकऱ्यांना मिळाले नाही ते देण्यात यावे, २०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिककर्ज वाटप अद्याप पर्यंत बँकांनी केले नाही ते त्वरित वाटप करवे, सन २०१८ व २२ मधील मंजूर झालेला पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावा, सन २०१९,२०, २१ व २३ मधील पिक विम्या पोटीची सरकारी देयक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी, एन डी आर एफ च्या नियमात सुधारणा करून पेरणीपूर्वीपासून पेरणी झाल्यानंतर व उत्पन्नाचा ५०% नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या