घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎

Image
 ‎ तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर अपघात- एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी ‎ वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण  ‎  तीर्थपुरी–घनसावंगी रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात भद्रेगाव येथील दीपक सोनाटकर (वय २८) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.     तनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणारी पलटी झालेली ट्रॅक्टर ट्रॉली (क्र. MH 23 Q 2318) रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर वा इशारे न लावता उभी असल्याने दोनही दुचाकी त्यावर आदळल्या.     रिफ्लेक्टरच्या अभावामुळे परिसरात अपघातांची मालिका वाढत असून नागरिकांनी साखर कारखाने व प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. ‎

जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू

जालन्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

घनसावगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी घनसावंगी तहसील कार्यालयासमोर घनसावंगीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी ३० सप्टेंबर सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला घनसावंगी तालुक्यातील सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी वर्ग यांनी पाठिंबा दिलाय.

यावेळी घनसांगी तालुक्यासह जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ मधील सर्व पिकांचा पिक विमा त्वरित मंजूर करून वाटप करण्यात यावा, संपूर्ण जालना जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, मोसंबी फळगळ नुकसान भरपाई द्यावी, यावर्षीच्या दुष्काळात जिल्हाभरात ३५०० हेक्टर फळबागा या पाण्याअभावी जुळून गेल्या आहेत त्याची नुकसान भरपाई द्यावी, सन २०२२ / २३ मधील ओल्या दुष्काळाचे अनुदान आणखीही जिल्हाभरात हजारो शेतकऱ्यांना मिळाले नाही ते देण्यात यावे, २०२३ मधील सोयाबीन व कापूस या पिकास देण्यात येणारे हेक्टरी ५००० रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकण्यात यावे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिककर्ज वाटप अद्याप पर्यंत बँकांनी केले नाही ते त्वरित वाटप करवे.

  सन २०१८ व २२ मधील मंजूर झालेला पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावास, न २०१९,२०, २१ व २३ मधील पिक विम्या पोटीची सरकारी देयक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात यावी, एन डी आर एफ च्या नियमात सुधारणा करून पेरणीपूर्वीपासून पेरणी झाल्यानंतर व उत्पन्नाचा ५०% नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणाला घनसावंगी तालुक्यातील सर्वच शेतकरी संघटना, सामाजिक संघटना, शेतकरी वर्ग यांनी पाठिंबा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या