अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद..!

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद..!


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांनी दि. २७.०९.२०२४ तसे पत्र काढलेय भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. प्रसार माध्यम यांना निमंत्रित करण्यात आलेय.

भारत निवडणूक आयोगाकडून दि. २७ व २८ सप्टेंबर, २०२४ रोजी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या तयारीबाबत घेण्यात आलेल्या राज्याच्या आढाव्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.२८ सप्टेंबर, २०२४ शनिवार दुपारी ३.४५ वाजता रूफटॉप हॉल, ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉईट, मुंबई इथे होणार आहे असे डॉ. राहुल तिडके संचालक माहिती, वृत्त व जनसंपर्क यांनी कळवले आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या