अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..!

अतिवृष्टीमुळे खरीपाचे प्रचंड नुकसान होउनही शासन-प्रशासन व विमा कंपनी कडून शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत एक छद्दामही नाही..!

सोयाबीन काढनी आधीही पाण्यात व नंतरही पाण्यातच..अनंत नैसर्गिक संकटानी शेतकरी हतबल 


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यात मागील महिन्यापासून चोहिकडे धुंवाधार पाऊस पडत आहे मध्यंतरी जिल्हाभरातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली यामुळे खरीप पिके पाण्याखाली जाऊन दहा ते बारा दिवस पिके पाण्याखालीच होती यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले मध्यंतरी पावसाने थोडीशी उघड दिली यामुळे शेतकरी आता सोयाबीनची काढणी करू लागलाय परंतु गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे हे काढणी केलेले सोयाबीनही पाण्यातच डूबत असल्याचे दिसून येत आहे यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजूने नुकसान होऊ लागलेय. विशेष म्हणजे खरीप पिकाचे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे एवढे नुकसान होऊनही अद्याप पर्यंत शासन-प्रशासन व पिक विमा कंपनी कडून नुकसाभरपाईची मिळालेली नाहीये तसेच त्याबाबत काही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नाही.

  शेतकरी राजाला गेल्या तीन-चार वर्षांपासून आनंत नैसर्गिक संकटाचा सामना करवा लागत असून यात दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी, रोगराई, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. एवढं सगळं करूनही शेतकरी कावड कष्ट करून पिकांना जपतो परंतु अचानकच नैसर्गिक संकट उभा राहते यामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या जाते यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत दिवसेंदिवस सापडत आहे

   गेल्या महिना भरापासून चोहिकडे धुंवाधार पाऊस पडत आहे.मध्यतरी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली यामुळे खरिपाची पीके पाण्याखाली गेली होती नंतर पावसाने उघड दिल्यामुळे शेकऱ्यांनी शेतात सोयाबीनची काढणी सुरू केली व कापसाचे बोंड कुठेतरी फुटत आहे. परंतु या पावसाने सोयाबीन आणि कापसाचे अतोनात नुकसान होत आहे. सध्या बळीराजा रात्रीपासून घामाने पिकवलेल्या सोयाबीन पिकाच्या काढणी केलेली आहे काही शेतकऱ्यांचे काढणी करून शेतातच सोयाबीन ठेवलेले आहे परंतु गेल्या दोन दिवसांपूर्वी पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे काढनि केलेले सोयाबीन पाण्यातच दुखत असल्याचे दिसतेय. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून सोयाबीन ला गोळा करण्यासाठी शेत मजुरासह ताडपत्री मध्ये झाकून ठेवण्यासाठी संघर्ष  करीत आहे. हातातून राशी आलेला घास नेहमीच निसर्ग हिसकावून घेतो. अचानक आकाशात भयानक आशा वीजा कडकत जोरदार व मुसळधार पाऊस सुरू आहे आणि खाली शेतकरी राजा आपल्या शेतातील काढणी करतो आहे व काढणी झालेल्या सोयाबीन एकत्र करून त्यावर ताडपत्रीं ने झाकून ठेवण्याचा केविलवाणी प्रयत्न करत आहे.सध्या हवामान खात्यांनी अंदाज सांगितला आहे की पाऊस असाच आठवडा भर राहू शकतो. अत्यंत मेहनतीने कष्टाने आणि खर्च करून अगदी आता सोयाबीनची रास घरात येण्याची वेळ आलेली असताना वरून राजा बळीराजाला नेहमीच त्रास दायक ठरत आहे कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा अनंत नैसर्गिक संकटाचा सामना करत शेतकरी राजा आपला राहाट गाडा हाकत आहे. तर दुसरीकडे खरीप पिकाचे अतिवृष्टी अवकाळी मुळे प्रचंड नुकसान झालेले असणार शासन प्रशासन व विमा कंपनीकडून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या शेती पिकाची नुकसान भरपाईचा एक छद्दामही मिळालेल्या नाही हे विशेष 




Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या