अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

वीज कोसळून १६ जनावरांचा मृत्यू..! तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी

वीज कोसळून १६ जनावरांचा मृत्यू..! तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी





काल रवीवारी वीजेच्या प्रचंड कडकडाटासह पाऊस झालाय यात वीज कोसळून पैठण तालुक्यात पंधरा जनावरांचा तर अंबड तालुक्यात एका जनावराचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर या विजेमुळे तीन शेतकऱ्यांसह एक महिला किरकोळ जखमी झालेत.

पैठण तालुक्यात विहामांडवा सालवडगाव शिवारात वीज कोसळून १५ जनावरांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दि.२२ रोजी दुपारच्या सुमारास घडलीय वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली.
रविवारी दुपारी पैठण तालुक्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान विहामांडवा परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊन जानकाबाई शकील चव्हाण (रा. सालवडगाव) यांच्या शेती वस्तीवरील गट नंबर ५४५ येथे वीज पडून गाभण असलेल्या ६ मेंढ्या एका कोकरुचा मृत्यू झाला. यासह सालवडगाव येथे मोमीन चव्हाण यांच्या वस्तीवरील ७ मेंढ्या व नानेगाव येथील शेतकरी विष्णू माने यांच्या एका म्हशीचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार सारंग चव्हाण यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना पंचनामा करण्याचा आदेश दिला. नियमानुसार वीज पडून मृत्यू झालेल्या जनावरांच्या मालकांना शासनाच्या वतीने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली आहे.
तर अंबड तालुक्यातील वडीगोद्री परीसरात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. परिसरातील करंजाळा येथे वीज कोसळून एक बैल दगावला तर तीन शेतकऱ्यांसह एक महिला जखमी झाली आहे.
    रविवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट सुरू होऊन मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वडीगोद्री परिसरातील करंजळा, अंतरवाली सराटी आदी भागात वादळी वारे व मेघगर्जने सह एक तास पाऊस झाला. करंजळा येथील गजानन काकासाहेब नांद्रे यांच्या गट नं १५१ मधील शेतात बैलगाडी ला बांधलेल्या बैलावर वीज पडून एक बैल दगावला. याचवेळी शेतात भूस भरत असलेले शेतकरी ज्ञानेश्वर नांद्रे,दीपक नांद्रे, ऋषी नांद्रे व सुलभा मिरकड या किरकोळ जखमी झाल्या. दुसरा बैल सुदैवाने वाचला. या मृत जनावरांची नुकसान भरपाई शासनाचे लवकरात लवकर द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या