ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटना: सात भाविकांचा मृत्यू; यवतमाळच्या जयस्वाल कुटुंबाचा संपूर्ण जीवितांत अंत

 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     उत्तराखंडमधील केदारनाथ येथे रविवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. आर्यन एव्हिएशन कंपनीचं हेलिकॉप्टर गौरीकुंड-सोनप्रयागजवळील दाट जंगलात कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि अवघ्या २३ महिन्यांची मुलगी काशी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेने एकाच कुटुंबाचा संपूर्ण उद्वंस झाला आहे.

दुर्घटनेचा तपशील

   आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने १५ जून रोजी पहाटे ५:१७ वाजता उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांतच, ५:२० च्या सुमारास हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. शोधमोहीमेदरम्यान, हेलिकॉप्टरचे अवशेष गौरीमाई खार्कच्या जंगली भागात सापडले. अपघातावेळी परिसरात दाट धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे हवामान अत्यंत खराब होते. त्यामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज हवामानाशी संबंधित आहे.

मृतांचा तपशील

  या दुर्घटनेत पायलटसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू राज्यातील भाविकांचा समावेश आहे.

   यवतमाळच्या वणी येथील राजकुमार जयस्वाल हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशी हिच्यासह १२ जून रोजी केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. मात्र दर्शनाआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. संपूर्ण कुटुंब या अपघातात संपुष्टात आलं.

शासकीय प्रतिक्रिया

     या भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, सर्व मृतदेह शोधण्याचे आणि त्यांच्या ओळखी पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  UCADA (Uttarakhand Civil Aviation Development Authority) ने दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, आर्यन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.

    ही दुर्घटना केवळ एक कुटुंबच नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी ठरली आहे. भाविकांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, यावर पुन्हा एकदा या दुर्घटनेने प्रकाश टाकला आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!