ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरने केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने १५ जून रोजी पहाटे ५:१७ वाजता उड्डाण घेतले होते. मात्र उड्डाणानंतर काही मिनिटांतच, ५:२० च्या सुमारास हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. शोधमोहीमेदरम्यान, हेलिकॉप्टरचे अवशेष गौरीमाई खार्कच्या जंगली भागात सापडले. अपघातावेळी परिसरात दाट धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे हवामान अत्यंत खराब होते. त्यामुळे अपघाताचा प्राथमिक अंदाज हवामानाशी संबंधित आहे.
या दुर्घटनेत पायलटसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडू राज्यातील भाविकांचा समावेश आहे.
यवतमाळच्या वणी येथील राजकुमार जयस्वाल हे पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशी हिच्यासह १२ जून रोजी केदारनाथ यात्रेसाठी रवाना झाले होते. मात्र दर्शनाआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. संपूर्ण कुटुंब या अपघातात संपुष्टात आलं.
या भीषण दुर्घटनेनंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, सर्व मृतदेह शोधण्याचे आणि त्यांच्या ओळखी पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
UCADA (Uttarakhand Civil Aviation Development Authority) ने दिलेल्या अधिकृत पत्रकानुसार, आर्यन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरचा अपघात खराब हवामानामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे.
ही दुर्घटना केवळ एक कुटुंबच नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी ठरली आहे. भाविकांची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे, यावर पुन्हा एकदा या दुर्घटनेने प्रकाश टाकला आहे.
Comments
Post a Comment