ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण
मिळालेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी निसर्गाचा क्रूर आविष्कार बघायला मिळाला, जेव्हा अचानक आलेल्या वादळी वाऱ्याबरोबरच विजांच्या तडाख्यांमुळे तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांचा, एका महिलेचा आणि एका तरुणाचा समावेश असून, या घटना तालुक्यातील सारोळा गवळी, मोढा बुद्रुक आणि पिंपळदरी या शिवारात घडल्या. या अपघातांनी संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
सारोळा गवळी येथील शिवारात दोन सख्खे भाऊ, यश राजू काकडे (वय १५) आणि रोहित राजू काकडे (वय २०) पेरणीसाठी शेतात गेले होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर ते आडोशासाठी झाडाखाली उभे होते. याच वेळी विजेचा जोरदार तडाखा बसला आणि दोघेही जागीच मृत्युमुखी पडले. दोघेही एकुलते एक मुलगे असल्याने काकडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
त्याच सुमारास मोढा बुद्रुक शिवारात रंजना बापुराव शिंदे (वय ५०) या आपल्या भावासह शेतातून परतत असताना अचानक वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा भाऊ जीवन सतीश गव्हाणे (वय २०) हा गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पिंपळदरी येथील शेतकऱ्यांचे दोन भाऊ, शिवराज सतीश गव्हाणे (वय २८) आणि जीवन गव्हाणे शेतकाम करत असताना वीज कोसळली. या घटनेत शिवराज यांचा मृत्यू झाला, तर जीवन गव्हाणे दुसऱ्यांदा जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान या तिहेरी दुर्घटनांमुळे संपूर्ण सिल्लोड तालुका शोकसागरात बुडाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचे सावट गडद झाले असून, स्थानिक ग्रामस्थांनी शासनाकडे तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसनाची मागणी केली आहे.
या प्रकारच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात अशा दुर्घटनांची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी सतर्कतेच्या सूचना जारी करणे आणि तातडीची मदत पोहोचवणे गरजेचे आहे.
Comments
Post a Comment