ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गारटेकी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, लष्करात कार्यरत असलेल्या लान्स नायक पवन शेषराव पवार (वय ३३) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक १३ जून रोजी घडली. पवार सध्या सुट्टीवर गावी आले होते. झाडाची फांदी तोडत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.
लान्स नायक पवन पवार यांनी भारतीय लष्करात तब्बल १३ वर्षे कर्तव्य बजावले. सध्या ते आसाममधील ईएमई बटालियनमध्ये कार्यरत होते. लष्करात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांची शिस्त, देशभक्ती आणि निष्ठा यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आणि गावातही आदरणीय होते.
शनिवारी (ता. १४ जून) दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर गारटेकी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला लष्कराचे अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा गावातून निघताना संपूर्ण परिसरात हळहळ आणि अश्रूंचा पूर उसळला.
पवन पवार यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावाने एक शूर, निष्ठावान आणि देशासाठी जीवन झोकून देणारा सुपुत्र गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व प्रशासनाने कुटुंबीयांना धीर दिला असून, सरकारकडून आर्थिक मदत व आवश्यक पाठबळ मिळावे, अशी मागणी केली जात आहे.
Comments
Post a Comment