ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

जालन्यात लष्करी जवानाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

 गावात शोककळा; भारतीय लष्करात १३ वर्षे सेवा बजावलेला शूर सैनिक काळाच्या पडद्याआड


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

   जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील गारटेकी गावात एक हृदयद्रावक घटना घडली असून, लष्करात कार्यरत असलेल्या लान्स नायक पवन शेषराव पवार (वय ३३) यांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक १३ जून रोजी घडली. पवार सध्या सुट्टीवर गावी आले होते. झाडाची फांदी तोडत असताना त्यांना विजेचा जोरदार शॉक बसला. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

     लान्स नायक पवन पवार यांनी भारतीय लष्करात तब्बल १३ वर्षे कर्तव्य बजावले. सध्या ते आसाममधील ईएमई बटालियनमध्ये कार्यरत होते. लष्करात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांची शिस्त, देशभक्ती आणि निष्ठा यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये आणि गावातही आदरणीय होते.

    शनिवारी (ता. १४ जून) दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर गारटेकी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला लष्कराचे अधिकारी, पोलीस प्रशासन, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा गावातून निघताना संपूर्ण परिसरात हळहळ आणि अश्रूंचा पूर उसळला.

पवन पवार यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावाने एक शूर, निष्ठावान आणि देशासाठी जीवन झोकून देणारा सुपुत्र गमावला आहे. स्थानिक ग्रामस्थांनी व प्रशासनाने कुटुंबीयांना धीर दिला असून, सरकारकडून आर्थिक मदत व आवश्यक पाठबळ मिळावे, अशी मागणी केली जात आहे.



Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!