ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

पेरणीसाठी शेतात उतरले जिल्हाधिकारी: सोयाबीन पेरणी करत शेतकऱ्यांचे मनोबल वाढवले

प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

 प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी थेट शेतात उतरून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत त्यांच्या पाठीशी उभा राहतो, हे फार क्वचितच घडते. मात्र बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी हे शक्य करून दाखवत एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे.

  खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात स्वतः जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी सोयाबीनच्या पेरणीसाठी तिफण हातात घेतली आणि चक्क चाडयावर मुठ धरत बी पेरले. या कृतीने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या मेहनतीला प्रशासनाची साथ असल्याची प्रचिती आली आहे.

    पावसाळ्याची सुरुवात होताच शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले असून, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः शेतात उतरले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर प्रशासनाकडून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

    या उपक्रमात तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

     श्री. जॉन्सन यांनी यावेळी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देताना योग्य बियाणांची उपलब्धता, वेळेवर खते आणि तांत्रिक सल्ला मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

    पेरणीच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खंडाळा गावाची पाहणी केली. त्यांनी महावितरणच्या विद्युत पोल्स आणि गावातील विद्युत वाहिनीची स्थिती तपासून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

   जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष सहभागामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले असून, हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!