ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
खंडाळा (ता. बीड) येथील शेतकरी बाबासाहेब चिंतामण जायभाये यांच्या शेतात स्वतः जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन यांनी सोयाबीनच्या पेरणीसाठी तिफण हातात घेतली आणि चक्क चाडयावर मुठ धरत बी पेरले. या कृतीने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, त्यांच्या मेहनतीला प्रशासनाची साथ असल्याची प्रचिती आली आहे.
पावसाळ्याची सुरुवात होताच शेतकरी पेरणीच्या कामात गुंतले असून, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः शेतात उतरले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर प्रशासनाकडून योग्य मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमात तहसीलदार चंद्रकांत शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
श्री. जॉन्सन यांनी यावेळी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती देताना योग्य बियाणांची उपलब्धता, वेळेवर खते आणि तांत्रिक सल्ला मिळावा यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
पेरणीच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी खंडाळा गावाची पाहणी केली. त्यांनी महावितरणच्या विद्युत पोल्स आणि गावातील विद्युत वाहिनीची स्थिती तपासून त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष सहभागामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले असून, हा उपक्रम इतर जिल्ह्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment