ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शुल्क परतफेड आणि निर्वाह भत्ता योजनांसाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी

 उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश..


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

     राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्काची परतफेड, निर्वाह भत्ता यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ वेळेत व प्रभावीपणे मिळावा यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या अंमलबजावणी संदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सुकानु समितीचे प्रमुख डॉ. नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रविंद्र कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख शासकीय विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.

    बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, उपाययोजना आणि विद्यार्थी केंद्रित योजनांची अंमलबजावणी यावर सखोल चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये आणि माहितीचा अभाव भासू नये, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात एक नोडल अधिकारी नेमणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

     राज्यातील लाखो विद्यार्थी विविध योजनांचा लाभ घेत असून, या योजनांची योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदत यासाठी नोडल अधिकारी प्रभावी भूमिका बजावू शकतील. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    या निर्णयामुळे शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी अधिक सुलभ होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक जलद आणि अचूक सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत उपस्थित तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!