ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

वीज वितरण कंपनी चा भोंगळ कारभार:संतप्त कुटुंबाचे लेकरा बाळासह भर पावसात वीज कार्यालयासमोर धरणे

एका भावाचे थकीत बील, दुसऱ्या भावाची लाईट कापली 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोडखा या गावातील आज बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका भावाकडे थकीत वीजबिल असल्याने, वीज वितरण कंपनीने दुसऱ्या भावाचे वीज कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता थेट कापले. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी पीडित कुटुंब आपल्या पत्नी आणि मुलांसह भर पावसात थेट घनसावंगी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडकले.

     पावसाची तमा न बाळगता त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून धरणे आंदोलन सुरू केले आहे. "आमच्यावर कसलाही थकबाकीचा दावा नाही, तरीही आमचे वीज कनेक्शन का कापले?" असा सवाल करत त्यांनी संबंधित ईंजिनीयरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

     या प्रकरणामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने, नातेवाईक असल्याचा आधार घेऊन वीज कनेक्शन कट करणे हे सर्रास अन्यायकारक आणि कायद्याच्या विरोधातील आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

    दरम्यान, याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही अधिकृत खुलासा दिलेला नाही. मात्र, संतप्त नागरिकांच्या या आंदोलनामुळे विभागातील इतर नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली असून, या प्रकाराचा निषेध होत आहे.

Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!