ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
पावसाची तमा न बाळगता त्यांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून धरणे आंदोलन सुरू केले आहे. "आमच्यावर कसलाही थकबाकीचा दावा नाही, तरीही आमचे वीज कनेक्शन का कापले?" असा सवाल करत त्यांनी संबंधित ईंजिनीयरवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.
या प्रकरणामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने, नातेवाईक असल्याचा आधार घेऊन वीज कनेक्शन कट करणे हे सर्रास अन्यायकारक आणि कायद्याच्या विरोधातील आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणताही अधिकृत खुलासा दिलेला नाही. मात्र, संतप्त नागरिकांच्या या आंदोलनामुळे विभागातील इतर नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली असून, या प्रकाराचा निषेध होत आहे.
Comments
Post a Comment