ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

Image
  व्यसनाचा भीषण शेवट- कुटुंबातिल तिघांचा झाला दुर्दैवी अंत.. वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण      एक अत्यंत दुर्दैवी व अंगाला शहारे आणणारी हृदयद्रावक घटना समोर आलीय ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट झाला असून कर्जबाजारीपणामुळे तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही आत्महत्या करत कुटुंबाचा अंत केला.      धाराशिव जिल्ह्यातील बावी (ता. कळंब) या गावात ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या लक्ष्मण जाधव या तरुण ट्रॅक्टर चालकाने आपल्या पत्नी आणि चिमुकल्या मुलाला संपवून स्वतः आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून, संपूर्ण गाव शोकाकुल वातावरणात आहे. आर्थिक अडचणीतून दुर्दैवी पाऊल    मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मण जाधव (वय अंदाजे ३०) हा गावातील कष्टकरी ट्रॅक्टर चालक होता. काही महिन्यांपासून त्याला ऑनलाइन रम्मी या मोबाईल गेमचं अतिशय व्यसन जडलं होतं. सुरूवातीला कमी रकमेने खेळत असताना काहीवेळा जिंकल्यामुळे त्याला त्या गेमची सवय लागली. मात्र...

घनसावंगी अपघात:थेट पुलाच्या खाली गेली कार

स्थानिकांकडून रस्त्याच्या सुरक्षेसाठी मागणी


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 

    घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली ते कुंभार पिंपळगाव रोडवरील बोडखा फाट्यावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने आलेली चारचाकी थेट रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या खाली गेली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधितांनी सदरील घटनेची पोलीस व आरोग्य विभागाकडे नोंद केली नाही. अपघात स्थळी पुलाखाली गेलेली चारचाकी गाडी क्रेनद्वारे ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली

     बोडखा फाटा हा अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी तीव्र वळण असून, कठडे तुटलेले आहेत. यामुळे वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्यास थेट रस्त्याबाहेर जावं लागतं. विशेष म्हणजे, या कठड्यांवर अद्याप रेडियम फलक लावले गेलेले नाहीत. रात्री वाहन चालकांना मार्ग नीटसा दिसत नाही, आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

    स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही या ठिकाणच्या सुरक्षेसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. आजच्या अपघातानंतर पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.



या रस्त्यावर वारंवार अपघात होतात हे पाहता, तातडीने खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे

तुटलेले कठडे दुरुस्त करणे

रेडियम फलक आणि दिशादर्शक लावणे

तीव्र वळणाचे स्पष्ट संकेत लावणे

वाहनचालकांसाठी सावधगिरीच्या सूचना देणे

   स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे की, या अपघातग्रस्त ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था लवकरात लवकर करावी, जेणेकरून भविष्यातील दुर्घटना टाळता येतील.


Comments

Popular posts from this blog

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!