घनसावंगी - आशा वर्करच्या मानधनातून लाच मागणाऱ्या दोन महिलांना रंगेहाथ पकडले

Image
  जालना एसीबीची घनसावंगी येथे यशस्वी सापळा कारवाई वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण    आशा वर्करच्या मानधनातून मोबदल्याच्या नावाखाली लाच मागणाऱ्या तालुका आरोग्य विभागातील दोन महिलांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांनी यशस्वी सापळा कारवाई करून  रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई मंगळवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी घनसावंगी तालुक्यात करण्यात आली.    तक्रारीनुसार, तक्रारदार आशा वर्कर असून त्यांच्या ऑक्टोबर महिन्याचे मानधन खात्यात जमा झाल्यानंतर त्याचा मोबदला म्हणून दोन हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.    त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी तालुका आरोग्य कार्यालय, घनसावंगी येथे पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी इलोसे क्रमांक १ कालिंदा बनसोडे यांनी दोन हजार रुपयांच्या मागणीवर तडजोड करत एक हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवून ही रक्कम  इलोसे   क्रमांक २ सविता म्हस्के यांच्याकडे देण्याचे सांगितले.    यानंतर घनसावंगी येथील...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एवढ्या शेतकऱ्यांना मिळणार नुकसाभरपाई..!

११७ गावातील ८४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित - ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे झाले नुकसान - २०१ जनावरे व पशुधन - ५८८ ठिकाणी झाली पडझड

शेती नुकसानी संदर्भात महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण


वास्तव न्युज - ओमप्रकाश उढाण

   महाराष्ट्रासह जालना जिल्हा व घनसावंगी तालुक्यात १, २ सप्टेंबर रोजी भयानक अशी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीत घनसावगी तालुक्यातील ११७ गावातील ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे तर तालुक्यातील एकूण ८४ हजार ६६० शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आह. तसेच २०० च्या वर पशुधन व जनावरे मृत्यूमुखी पडले यांबरोबरच ५८८ घरांची पडझड झाली असून नैसर्गिक आपत्ती मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी एका जणाला आर्थिक मदत मिळालेली आहे.

मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सुचल्यानंतर यावर्षी मान्सूनच्या पावसाचं मे महिन्याच्या आगमन झालं परंतु तालुका भारत कोठेच दमदार पाऊस झाला नाही या जेमतेम पावसावरच शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी लागवड केली होती तेव्हापासून तालुका भरात सतत जमतेमच पाऊस पडत होता या पावसावरच पिकाची मदार होती परंतु १, २ सप्टेंबर पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतीचं मोठं नुकसान होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. तालुका भरात विविध भागांत झालेल्या अती मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टी झाल्यामुळे उभ्या पिकांचं नुकसान झाल व शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. या अतिवृष्टीमुळे बंधारे गोदावरी नदी छोटे-मोठे तलाव ओढणारे सर्वच ओवर फ्लो होऊन वाहत होते, अनेक शेतजमिनी जलमय झाल्या होत्या. महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू केली होती यात घनसांगी तालुक्यातील ११७ गावांमध्ये आठ महसूल मंडळातील ४९ सजा मधील महसूल चे अधिकारी कर्मचारी कृषी विभाग तलाठी ग्रामसेवक यांनी पंचनामे पूर्ण केलेत यामध्ये तालुक्यातील ११७ गावातील ८४ हजार ६५९ शेतकऱ्यांचे ८३ हजार ७० हेक्टर क्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाले तसेच वीज पडून पुरात वाहून तीन जणांचा मृत्यू झाला होता यातील अराणी येथील नैसर्गिक आपत्तीचे रक्कम जमा झाली याबरोबरच तालुका भरामध्ये ५८८ ठिकाणी पडझड झाली असून २०० च्या वर जनावरे व पशु यांचा या अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालाय.



महसूल विभागाचा पंचनामे पुर्ण माहिती पाठवली..

   अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे, पडझडीचे, जनावरें, पशुधन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले मयत व इतर बाबतचे घनसावंगी तालुक्यातील ११७ गावातील पंचनाम्याचे काम महसुल विभाग, कृषी विभाग, ग्रामसेवक यांनी पार पाडले असून पंचनामाचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसान भरपाई चे झालेले पंचनामे व इतर माहिती शासन व प्रशासन यांच्याकडे पाठवण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीत घनसावंगी महसूल विभागाकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही. सदरील अतिवृष्टीचा निधी आल्यानंतर तो शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करण्यात येईल. 

- योगिता खटावकर, तहसीलदार घनसावंगी

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या